Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Bhaskar more | भास्कर मोरे प्रकरणात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मोठे वक्तव्य..

Bhaskar more | भास्कर मोरे प्रकरणात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मोठे वक्तव्य..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 19, 2024Updated:March 19, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर :-

विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे Bhaskar more याचा सोमवारी दि.१८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. मोरेच्या अडचणी वाढत आहेत.सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे.रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुमारे ११ दिवस उपोषणास बसले होते. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले हे देखील उपोषणास बसले होते.

Nilesh lanke| आमदार निलेश लंकेची लोकप्रियता वाढली ;जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार स्वागत

Bhaskar more प्रकरणात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मोठे वक्तव्य..

डॉ. मोरे याच्या विरोधात दि.८ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेने दि.१३ रोजी अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा डॉ. मोरे यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर हरीण पाळल्या प्रकरणी डॉ. मोरेला वनविभागाकडुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंबधात अटक केली होती.वनविभागाची चार दिवसांची दि २० पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

सोमवारी दि.१८ रोजी डॉ. मोरे याच्याजामिन अर्जावर मुळ फिर्यादीच्यावतीने अॅड सुमीत बोरा व अॅड अमोल जगताप तसेच सरकारच्यावतीने सरकारी वकील अॅड. संदीप नागरगोजे यांनी बाजु मांडताना न्यायालयासमोर सांगितले की,डॉ. भास्कर मोरे Bhaskar more याने केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर अघात करणारा असुन, समाजातील दुर्बल घटकावर अत्याचार करणारा आहे. सदर आरोपी फरार होण्याची दाट शक्यता आहे तसेच सदर आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यानंतर न्यायालयाने वरील सर्व बाबींचा विचार करून व फिर्यादीच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जामखेड न्यायालयाने डॉ. भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला.

Table of Contents

Bhaskar more प्रकरणात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे मोठे वक्तव्य..

मंगळवार दिनांक १९-०३-२०२४ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कमिटीची मीटिंग आयोजित केली आहे. या कमिटीमध्ये विद्यर्थ्यांना निमंत्रित केले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊन त्या विषयी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना जिल्हाधिकारी साहेब यांनी दिल्या. यावेळी मुलींनी मोरे Bhaskar more विषयी जे सांगितले ते ऐकून जिल्हाधिकारी पण थक्क झाले. यावेळीउपोषणकर्ते पांडूराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, केदार रसाळ , इत्यादी जामखेड मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वेगवेळ्या विद्यापीठाच्या कमिटीचे सदस्य उपस्थित होते, त्यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांनी केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये काय काय त्रुटी आहेत हे समजून घेतले, यावेळी असे दिसून आले की, या संस्थने विद्यापीठाची सुद्धा फसवणूक केली आहे हे दिसून आले. तसेच वाजवी पेक्षा जास्त फी विद्यार्थ्यांनाकडून घेतली आहे यावेळी दिसून आले.

या सर्व कमिटीचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी असे सांगितले की, या संस्थेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी हि त्या त्या कोर्सच्या विद्यापीठाची आहे. आत्ता विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहे, त्यामुळे त्यांची परीक्षेचे नियोजन करावे. एकाही मुला – मुलीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचे नियोजन करावे.

अशा भास्कर मोरे Bhaskar more सारख्या अजून संस्था असतील तर त्याचे पण इन्स्पेक्शन करावे , जेणे करून अशा घटना परत जिल्ह्यात घडायला नकोत अशी सूचना विद्यापीठ कमिटीला अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleshirdi loksabha| शिर्डीसह नगर दक्षिण मध्ये बौद्ध उमेदवाराला उमेदवारी द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार – सुमेध गायकवाड.
Next Article JUNIOR IAS | ज्युनियर आय .ए .एस् . परीक्षा उत्तीर्ण श्रेयशी भोसले हिचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले अभिनंदन !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.