कल्याण : कल्याण शहरात पतीने पत्नीची निर्घृण हत्या murder केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा केल्यानंतर आरोपी स्वतः नाशिकला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला आणि “मी बायकोला मारून आलोय” अशी थेट कबुली दिली. हे ऐकून पोलिसही काही क्षण हादरून गेले.
gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं
murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर असे आरोपीचे नाव असून तो कल्याणमधील उंबर्डे परिसरात राहतो. त्याची पत्नी अर्चना भुतकर हिच्यावर तो सतत चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून वाद होत होते. घरातील सततच्या भांडणांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

दरम्यान, गुन्ह्याच्या दिवशी विशाल उंबर्डे येथे आला असता पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. रागाच्या भरात विशालने अर्चनाचा गळा आवळून तिची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर तो थेट नाशिकला निघून गेला.
Table of Contents
नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या भावाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर भावाने त्याला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. तेथे विशालने पोलिसांसमोर “मी बायकोचा खून करून आलोय” अशी कबुली दिली. अचानक दिलेल्या या कबुलीमुळे पोलिसही काही काळ स्तब्ध झाले.

विशालच्या कबुलीनंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची खातरजमा केली. तपासात अर्चनाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे भुतकर दांपत्याच्या दोन मुलांवर मोठा आघात झाला आहे. आईचा मृत्यू आणि वडील तुरुंगात अशी दुर्दैवी परिस्थिती या मुलांवर ओढावली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.