अहमदनगर :- अहमदनगरचे भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी अशोक कडूस , अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र , वरिष्ठ सहायक विजय थोरात यांना त्वरीत निलंबीत करून दि. २६ / ६ /२३ पर्यंत कायदेशीर कारवाई करा अन्यथा दि.२६ /७ /२३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रार राजेद्र शिंदे यांनी दिला आहे.

दि.१८ / ५/२३ रोजी मा. मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणविस , शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकजी केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की तकारदार यांनी मंत्रालय पातळीवर सर्व अधिकारी वर्ग ते खालील शिक्षण आयुक्त , शिक्षण संचालक , उपसंचालक अदि. ना वेगवेगळ्या मुद्यांसह व पुराव्यासह जवळ जवळ २००० हजार तक्रार अर्ज दिले शिक्षण आयुक्त कार्यालया समोर उपोषणही केले .

त्यांनी लेखीही दिले , उपसंचालक यांनी चार चौकशी समित्या नेमल्या परंतू एकाही समितीने चौकशी केली नाही. फक्त वेळकाढू पणा केला. मंत्रालयातील बनावट आदेशाचा वापर करून तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षक मान्यता दिल्या . प्रत्येकाकडून प्रत्येकी १५ ते२५ लाख रुपये घेतले आहेत . त्यामुळे कोटींचा व्यवहार झाला आहे. विधानसभेतही प्रश्न विचारला होता . सदर प्रकरणात दोषी शिक्षणाधिकारी . अधिक्षक, वरिष्ठ सहायक यांच्यावर कारवाईचे आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले होते.
त्यामुळे त्यांचा निलंबनाचा प्रास्ताव शिक्षण आयुक्त पुणे यांनी शासनास सादर केला आहे परंतु आज अखेर फाईल शिक्षण मंत्री महोदयांच्या टेबलवर पडून आहे ही दुदैवी बाब आहे . दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी परत मे / जून २०२३ मध्ये अनेक शिक्षकांना बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत . एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरावे , तक्रारी असूनही कारवाई होत नसल्याने मुजोर व भ्रष्ट शासन व्यवस्थेपुढे हार मानून मी दि.२६ /७ / २३ रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री , मुख्यसचिव, मुख्य सचिव गृहविभाग. शिक्षणसचिव , अवर सचिव , पोलिस महासंचालक , शिक्षण आयुक्त , शिक्षणसंचालक , उपसंचालक . अदि. सर्वाना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे .
