संपादक :-सचिन कांबळे:- 9604737188
महालोकवाणी न्यूज:-दिनांक 24 जाने 2023
नेप्ती, अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांची करिअर लॅबस बेंगलोर आयोजित कॅम्पस ड्राईव्ह मध्ये निवड झाली असून त्या माध्यमातून तीन ते साडेसात लाखांचे भर भक्कम वार्षिक पॅकेज उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये अंतिम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू असतानाच बेंगलुरु येथील कंपनीत निवड झाली आहे त्यामुळे छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे … बेंगलोर येथील करिअर लॅम्प्स या कंपनीतर्फे श्री सलमान जिया , कंपनी सेक्रेटरी , मनोज पडघन श्री अतुल सागर श्री मयंक यादव यांच्या टीम मार्फत महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये छत्रपती शिवाजी अभियांत्रिकीच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पर्सनल तथा टेक्निकल इंटरव्यू घेण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होण्याकरता सुसज्ज असा ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट विभागामार्फत पूर्व तयारी करून घेऊन निवड होण्याकरता पूर्ण कौशल्य साठी व्यासपीठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. महाविद्यालयामध्ये असणाऱ्या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमी खर्चात शैक्षणिक सोयी सुविधा या उपलब्ध असून त्यांचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभघ्यावा असे आव्हान प्राचार्य. डॉ. वाय आर खर्डे यांनी केले आहे.
महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना व रोजगार अभिमुख शिक्षण यावरती विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत आणि त्याचे रिझल्ट हे प्लेसमेंटच्या माध्यमातून आपल्या समोर येतच आहे’ तसेच कंपन्यांमध्ये निवडी करता महाविद्यालयांमध्ये सुसज्ज असणारा ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग हा अंतिम अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतो त्यामध्ये प्रामुख्याने कंपनी करता लागणाऱ्या स्किल्स चा समावेश होतो.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे पाटील, सचिव माननीय श्री जी डी खानदेशी, सहसचिव माननीय श्री विश्वासराव आठरे , खजिनदार माननीय श्री विवेक भापकर व सर्व संस्था विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
