महालोकवाणी न्यूज:
जामखेड तालुक्यातील एका सामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व असणारे निलेश भाऊ गायवळ हे पुणे येथे कामानिमीत्त गेले, आणि त्यांनी पुणे येथे आपल्या सामाजिक , राजकीय जीवन जगत असताना त्यांनी अतिशय खडतर जीवन जगत असताना , मार्ग काढत आपले पुणे येथे आपले साम्राज्य निर्माण केले, त्यांनी सामजिक क्षेत्रात पण उत्तम कार्य करत गोरगरीब लोकांना मदतीचा हात देत असतात

निलेश (भाऊ ) गायवळ यांच्या वाढदिवसाला त्यांचे असंख्य असणारे कार्यकर्ते हे सामाजिक भान जतन करत भाऊंचा वाढदिवस हा गोरगरीब लोकांना मदत करत , किंवा गोशाळेत चारा वाटप करत, तसेच अनाथ मुलांना मदत करत , साजरे करत असतात ,

निलेश भाऊंच्या वाढदिवसानिमीत्त अहमदनगर येथील त्यांचे मित्र अॅड. . मयूर डोके पाटील नगरमधील बालघर प्रकल्प येथील अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप केले तसेच बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांना गोड जेवण देण्यात आहे, तसेच यावेळी बोलताना ते म्हटले कि, युवराज गुंड यांनी अतिशय खडतर प्रवासातून हि संस्था उभी केली आहे, त्यांना जर काही मदत लागली तर ते हक्कानी सांगत असतात, त्यांना आता एका खोलीची आवश्यकता आहे, त्यांनी मला सांगितले आहे, या संदर्भात मी निलेश भाऊंशी तसेच आमच्या मित्र परिवाराशी चर्चा करून जेवढी मदत करता येईल तेवढी करू, पूढे बोलताना मयूर डोके पाटील म्हटले की , निलेश गायवळ यांचा वाढदिवस हा एक उत्सव म्हणून साजरा होत आहे .
यावेळी बालगृह प्रकल्पातील अनाथ मुलांना गोड जेवण देण्यात आहे . या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते सर, युवा उदयोजक तोफीक सय्यद , अशोक जाधव हे उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे प्रास्तविक बालघर प्रकल्पाचे सर्वेसर्वा युवराज गुंड यांनी केले ,
