Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा..

पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा..

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

१९५० साली भारत गणराज्य असल्याची घोषणा केली गेली आणि त्याचवेळी पहिली गणतंत्र परेड केली गेली. या परेडमध्ये ३ हजार जवान आणि १०० लढाऊ विमाने सामील झाली होती. तत्कालीन गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी २६ जानेवारी १९५० या दिवशी सकाळी १० वा.१८ मिनिटांनी भारत गणराज्य बनल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर सहा मिनिटांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

प्रजासत्ताक दिनाचा समारोह पूर्वीच नक्की करण्यात आला होता. त्यानुसार दुपारी अडीच वाजता डॉ. राजेंद्रप्रसाद आपण नाणेफेक जिंकून मिळविलेल्या ऐतिहासिक बग्गीतून राष्ट्रपती भवनातून निघाले आणि ३ वा. ४५ मिनिटांनी त्यावेळच्या इर्विन आणि आताच्या नॅशनल स्टेडियम मध्ये पोहोचले. तेथे त्यांना ३१ तोफांची सलामी दिली गेली. या कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेलाही सामील केले गेले होते.

१९५५ सालपासून प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथवरून काढण्याचा आणि ध्वजारोहण लाल किल्ल्यावर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो उपस्थित होते. अत्तापर्यंत ४४ देशाचे प्रमुख नेते प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्तक दिनाला उपस्थित राहिले आहेत.

१९५९ मध्ये प्रथम परेड पाहायला येणाऱ्या लोकांवर विमानातून पुष्पवृष्टी केली गेली. १९६२ मध्ये चीनकडून युद्धात पराभव पत्करावा लागल्यावर देशएकतेचे प्रतिक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू अनेक खासदारांसह एक दल बनवून परेडमध्ये सामील झाले होते. याच वर्षी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत गाईले. ७१ च्या पाक युद्धानंतर सुरक्षेच्या कारणाने काही बदल केले गेले.

१९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमरजवान ज्योतीवर श्रद्धांजली वाहण्याची प्रथा सुरु केली आणि १९८२ साली प्रथम रंगीत व्हिडीओ शुटींग केले गेले. आता प्रजासत्ताक दिनाच्या परेडची भव्यता खूपच वाढली असून देश विदेशातून ती पाहण्यासाठी लोक येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Next Article किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती..
mahalokwani
  • Website

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.