सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी
महालोकवाणीन्युज:पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागात बीड पाटबंधारे विभागाच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा करणाऱ्या जवळपास चाळीस शेतकऱ्यांच्या विजपंपाची चोरी झालेली आहे.तशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आज रोजी(ता.१४)दिली आहे. वडगाव व चिचंपुर पांगुळ,ढाकनवाडी येथील सुमारे चाळीस शेतक-यांच्या बेलपारा मध्यम प्रकल्पातील विजपंपाची चोरी येथील जवळच्याच लोकांनी केली आहे. शेतक-यांनी पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केल्यामुळे चोरट्यांचेजास्तच फावले आहे.

सुमारे चाळीस विजपंपाची किंमत तब्बल सतरा ते अठरा लाख रुपयापर्यंत आहे. शेतक-यांचे विजपंप चोरणा-या टोळीचा तपास पोलिसांनी करून चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत तुकाराम नारायण बडे (रा.चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी)या शेतक-याने पोलिसात १० अस्वशक्तीचा विजपंप चोरी गेल्याची फिर्याद दिली आहे.सुमारे विस ते पंचवीस शेतकरी देखील यावेळी पोलिस ठाण्यात आले होते.

आशिष बडे, भगवान गरड, केशव केदार, घनश्याम पांगरे, आजिनाथ पांगरे, रामनाथ गरड, सुभाष शेळके, हुसेन शेख, प्रभाकर रामराव बडे, किरण बडे, त्रिंबक गरड, केशव केदार,पोपट बडे,आजिनाथ गरड यांच्यासह अनेक शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत. चिचंपुर पांगुळ वडगाव व ,ढाकनवाडी या गावातील सुमारे चाळीस विजपंप चोरीला गेलेले आहेत. परीसारतील चोरटेच हे काम करीत असल्याचे शेतक-यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांना सांगितले असून, चोरीची तक्रार एका शेतक-याने दिली असुन पंचवीस ते तिस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत असे तक्रारीत म्हटलेले आहे.
बेलपारा मध्यम प्रकल्पातुन सुमारे चाळीस शेतक-यांचे विजपंप चोरीला गेले आहेत. यामुळे शेतकरी आता रडकुंडीला आले आहेत. यावेळी शेतक-यांनी काही संशयीत लोकांचे नावे पोलिस अधिका-यांना सांगितले आहेत. लवकर चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी सुमारे चाळीस शेतक-यांनी पोलिस अधिका-यांना भेटुन केली आहे.
