मुंबई : मुंबई येथील मालाडमध्ये मोठी घटना घडली आहे. एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे
“मुंबईतील मालाड पूर्व , आप्पा पाडा येथे सोमवारी ५०० हून अधिक झोपड्यांना आग लागल्याची घटना वेदनादायी आहे. या परिसरातील १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी खालील मागण्यांचे निवेदन आज शालेय शिक्षणमंत्री मा.दीपक केसरकर यांना देण्यात आले. छात्रभारती आप्पा पाड्यातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत छात्रभारती पाठपुरावा घेईल”
- रोहित रमेश ढाले, राज्याध्यक्ष
( छात्रभारती विद्यार्थी संघटना)