वजन कमी करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. असाच अनुभव विवेक क्षीरसागर आहे. फूडी असणाऱ्या विवेकने 10 महिन्यात तब्बल ४० किलो वजन कमी केलंय, कसा होता हा प्रवास जाणून घेऊया.
बदलती जीवनशैली आणि कामाचा ट्रेस या सगळ्यामुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. अशावेळी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्याही डोकं वर करताना. या सगळ्यावर वजन कमी करणे हा एकच रामबाण उपाय ठरतो. पण वजन कमी करणे आणि तो संपूर्ण प्रवास प्रत्येकालाच साध्य करता येईल की नाही हे सांगण कठीण होतं.
अशावेळी आपण एकमेकांकडून प्रेरणा घ्यायला हवी. विवेक या तरूणाने 10 महिन्यात ४० किलो वजन कमी करण्याचा टप्पा गाठला आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या प्रवासात त्याने काय केलं? कोणत्या गोष्टीमुळे त्याचे वजन कमी झाले, हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येकाचं शरीर आणि वजन कमी करण्याचा प्रवास हा भिन्न असू शकेल. पण या प्रवासातून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल यात काहीच शंका नाही.

डाएट फॉलो
नाश्ता – एक प्लेट भरून फळं/ मूठभर काजू
दुपारचे जेवण – 50 ग्रॅम पनीर, अर्धी भाकरी (ज्वारी किंवा बाजरी) भाजीसोबत, 1 वाटी डाळ, 1 वाटी दही सॅलड्स/ खिचडी सोबत भाज्या/ थालीपीठ.
रात्रीचे जेवण – पालक चीला/सूप सलाद/खिचडीसोबत
प्री-वर्कआउट – एक कॉफी शॉट
पोस्ट-वर्कआउट – दुपारच्या वेळी वर्कआऊट करत असल्यामुळे वर्कआऊट नंतर जेवण घेतलं जायचं
वर्कआऊट

जीमसोबतच चालण्याकडे विवकेने अधिक लक्ष दिलं. पहाटे 5:15 वाजता उठून विवेक 7-9 किमी धावण्यासाठी जातो आणि त्यानंतर 108 सूर्यनमस्कार आणि त्यानंतर योग आणि प्राणायाम करतो. मग, 3 तासांच्या विश्रांतीनंतर, विवेक यानंतर वेट ट्रेनिंग आणि फक्शनल ट्रेनिंग घ्यायचा, HIIT आणि जिममध्ये जायचं.
एवढंच नव्हे तर विवेक यानंतर संध्याकाळी 2 ते 4 तासांपेक्षा जास्त बॅडमिंटन खेळायचा. तो म्हणाला की, मी माझ्या वर्कआउटमध्ये एकूण 6-7 तास गुंतवले. यामुळे जंक फूडकडे लक्ष गेलंच नाही आणि मी माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रीत केलं.
आता, मी साखर खात नाही, बेकरीच्या वस्तू आणि जंक फूडही टाळतो. दिवसाचे शेवटचे जेवण, मी संध्याकाळी 6 वाजता घेतो आणि त्यानंतर काहीही खात नाही. याव्यतिरिक्त, मी सुमारे 3.5-4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करतो.
यासंदर्भातील योग्य निर्णय आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे.
