
रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज मध्ये बी. फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा विनयभंग व अत्याचाराच्या निषेधार्थ दि २३ मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून

रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज ता. जामखेड मध्ये एका मुलीवर खुद्द संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे या नराधमाने विनयभंग व अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली असून दि ४ मे २०२३ रोजी संबंधित पिडीत मुलीने जामखेड पोलीसांत तशी तक्रार दाखल केली आहे . त्या नराधमाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वेळोवेळी विनयभंग केल्याचे स्पष्ट सांगितले आहे मात्र त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नाही . या गंभीर प्रकरणाची कोठेही वाच्यता होऊ दिली नाही .

पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही काळीमा फासणारी घटना आहे. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीत जिजाऊंच्या लेकिंवर शारीरिक शोषणं होतं असताना प्रशासकीय यंत्रणा , मिडीया , लोकप्रतिनिधी , आमदार , खासदार व सर्व सामान्य जनता देखील मुगगीळू बसली आहे हे सर्व निषेधार्ह आहे .

आन्याय झालेली मुलगी दुसऱ्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील आहे म्हणून तिला न्याय मिळतं नसेल तर हे लोकप्रतिनिधी , मिडीया व प्रशासकीय यंत्रणांच्या लोकभावना बोथट झाल्याचे लक्षण आहे .आरोपी गडगंज श्रीमंत आहे म्हणून त्या विरोधात कोणी आवाज उठवणार नसेल तर हे महाराष्ट्रासाठी व जामखेड तालुक्यासाठी षंढपणाचे लक्षणं आहे म्हणून या आत्याचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने दि २३ मे रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करत आहेत.
