पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात, तुम्ही नियम पाळले तर ते देखील पाळतीलच- कु.सुकन्या क्षेत्रे
नगर – सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन श्रमिकांचे भवितव्य बदलून समाज परिवर्तनाचे कार्य सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने हाती घेऊन शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी 108श्री. महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालयाच्या व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्याचे वार्षिक शैक्षणिक अहवालामधून दिसून आले. पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात. पाल्यांना तुम्ही नियम पाळताना दिसले तर ते देखील पाळतीलच. तेव्हा टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलरमध्ये प्रवास करताना सिटबेल्ट वापरा, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक कु. सुकन्या क्षेत्रे यांनी केले.
धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय या दिवशी ..!
नगर येथील दातरंगे मळा येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 108श्री. महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून कु.सुकन्या क्षेत्रे, शासकीय तंत्रनिकेतन कार्यशाळा अधिक्षक डॉ.दादासाहेब करंजुले, संस्थेचे विश्वस्थ आर.ए.देशमुख, दादासाहेब भोईटे.रामभाऊ बुचकुल.बाळकृष्ण सिद्दम. रघुनाथ का रमपुरी.प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सुचित्रा डावरे, प्राचार्य संदिप कांबळे, डॉ.निलेश जाधव, भरत बिडवे, मुख्याध्यापिका सौ.अनिता सिद्दम, सौ.अंजली शिरसाठ, सौ मीरा नराल आदि उपस्थित होते.
कु. सुकन्या क्षेत्रे यांनी भाषण करतांना विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी प्रश्न विचारले. वाहतुकीचे नियम, चौकातील सिग्नल बाबत लाल, हिरवा, पिवळा दिव्या चे काम आपण काय बोध घेतो. या सर्वांची समाधानकारक उत्तरे मुलांनी दिले. या संवादातून वाहतुकीचे नियम कसे पाळायचे,आहारातील पॅकींग फूड, फास्टफूडचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल माहिती देऊन मुलांबरोबर उपस्थित पालकांना देखील जनजागृती करून पालकांनी मुलांच्या जडण-घडण या कडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले
अध्यक्षीय भाषणात डॉ.दादासाहेब करंजुले यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देत त्यांचे चांगले भविष्य घडविण्याचे काम या विद्यालयातून शिक्षक करतात ही बाब अभिनंदनीय आहे. मोबाईलमुळे, पालक व मुलांमध्ये संवाद होत नाही ही खंत व्यक्त करुन पालकांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवून प्रोत्साहन देण्याचे काम करावे. शिक्षक, आई, वडिल यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा असे सांगितले.
प्रास्तविकात मुख्याध्यापिका सौ.अंजली शिरसाठ व सौ.मीरा नराल यांनी शैक्षणिक अहवाल वाचन करुन वर्षभरात विद्यालयाने केलेले उपक्रम, शाळा स्वच्छता मोहिम, योगदिन, एसएससी, स्कॉलरशिप निकालात मिळविलेले सुयश आदिंबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी आदिंनी मनोगते व्यक्त करुन बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सूत्रसंचालन सौ. विजया नवले यांनी केले तर आभार श्री. बापुसाहेब गायकवाड यांनी मानले.
