सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: –
अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य संत भगवानबाबा यांनी सुरु केलेला नारळी सप्ताह निमित्ताने दि.०४ एप्रिल ते दि.११ एप्रिल या कालावधीत आयोजित ८९ वा.नारळी अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता.

दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा भजन, रामकथा, दररोज रात्री कीर्तन,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज (ता.११)रोजी भगवान गडाचे महंत हभप.नामदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता संत भगवानबाबा यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत सप्तहाची सांगता करण्यात आली.
सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत,राजकीय नेते यांनी भेट दिली. सांगता प्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री धनंजय मुंडे,शेवंगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शास्त्रीनी जरी शिव्या घातल्या तरी माझ्यासाठी त्या फुले असतील असे नामदेव शाश्री यांना उद्देशून पंकजा मुंडे बोलतांना म्हणाल्या.तर धनंजय मुंडे हे म्हणाले की ताई म्हणाली होती की मी भगवान गडाची पायरी आहे. जर ती पायरी असेल तर मी त्या पायरीचा दगड आहे.
आमच्यात दुरावा हा राजकारणात असला तरी आम्ही नात्याने एक आहोत .आज काही वेळ का होईना ताई माझ्याजवळ आहे.याचे मला समाधान आहे,
असेही धनंजय मुंडे म्हणाले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे तसेच महंत नामदेव शास्त्री हे आज एकाच व्यसपीठावर एकत्र आल्याने भाविक समाधान व्यक्त करताना दिसत होते.
दरम्यान या सप्तहाची सांगता प्रसंगी राज्यभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
लाखोंचा भाविक समाज यावेळी उपस्थित होता. अन्नदान ,पाणी,पार्किंग व्यवस्था,आरोग्य सेवा आदींची व्यवस्था ग्रामस्थांनी चोख ठेवली होती.
भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले.
