Nagar 23sep : Ahmednagar Rain अहमदनगर मध्ये एकाच पावसातसर्व ओढे नाले तुंबून सर्व पाणी शहरात घुसले आहेत, याला महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही , कारण त्यांची नियुक्तीच नगर शहरातील ओढे, नाले , रस्ते , ओपन स्पेस , गायब करण्यासाठी झाली आहे का असा प्रश्न नगरकरांना पडला आहे .
Ahmednagar Rain। अहमदनगरमध्ये पाणी
कारण त्यांना नगरमधील जे जागुरक , सामाजिक कार्यकर्ते , किंवा अनेक प्रभागातील नगरसेवक यांनी ओढे , नाले, मोकळे करावे , त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी यांनी अनेक वेळा निवेदन, तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत, पण चारठाणकर साहेब यांनी त्यांच्या डोळयांवर पट्टी बांधली आहे , आणि ती पट्टी नगर शहरातील अनेक बड्या नेत्यांनी, बांधलेली आहे, त्यामुळे त्यांना ओढे , नाले , यांचे काही घेणें देणे राहिलेले नाही, असे चित्र पाहायला मिळत आहे.

त्याचाच अनुभव नगरकरांनी पहिल्याच Ahmednagar Rain पावसात घेतलेला पाहायला मिळत आहे , आत्ता पर्यंत पहिल्याच पावसात नगर कधीच तुंबले नाही, ते मा. चारठाणकर साहेब यांनी करून नवा विक्रम केलेला आहे असेच म्हणावे लागेल, त्यांनी नगर शहरातील ओढे, नाले , इतर अनेक गोष्टी नष्ट करण्याचा मानस घेतला आहे असे वाटत आहे.
नगर शहारातील मुख्यतः सावेडी उपनगरातील ओढे- नाले नास्तानाभूत होताना पाहायला मिळत आहे, पूर्वी या ओढ्याची लांबी रुंदी हि एखाद्या नदी प्रमाणे पाहायला मिळत होती, आता हे नालेच पाहायला मिळत नाहीत, जे शिल्लक आहेत त्यांची लांबी रुंदी मोजण्या जोगी राहिलेली नाही.
आता पावसाचे दिवस आहेत Ahmednagar Rain , अहमदनगर महानगर पालिकेने ओढे नाले साफ सफाई साठी लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यांचे बिले हे काढले आहेत, मंग जर शहरात नाले ओढे हे गायब झालेले आहेत , आहेत त्यांची स्थिती नसल्यात जमा आहे, मंग हि साफसफाई किती नाल्याची झाली त्याची लांबी रुंदी किती, त्याला किती खर्च केला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव केली आहे .
नगर Nagar शहरात ताबा गॅंग नंतर आता ओढे नाले आणि रस्ते गायब करणारे टोळी सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे, जो रस्ता १८ मीटर होता तो आता ६ मीटर पण भरत नाही , पालिकेने वेळोवेळी संबधीताना सांगून सुद्धा या ठिकाणी कामकाज चालू केले आहे.
या ठिकाणी पालिकेने मोजनि सुद्धा केलेली आहे, हि टोळी पालिका तसेच स्थानिक नगरसेवक यांना न जुमानता हा रस्ता गिळण्याच्या तयारीत आहेत, मंग नगर रचना विभागाचे कर्मचारी काय काम करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे, का या कर्मचाऱ्याचे तसेच अधिकाऱ्याचे हात या संपूर्ण प्रकरणात गुंतलेले आहेत याची पण चौकशी करण्यात यावी असे जाधव यांनी मागणी केली आहे, व याला सर्वस्वी महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल ?
