महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी सत्ता संघर्षावर काही प्रश्न विचारले असता त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणे टाळले आहे यावरून असे लक्षात येते की माननीय एकनाथ शिंदे हे उद्याच्या स सत्ता संघर्षाबाबत तणावात दिसत आहेत सूत्रसंचा जर हा निकाल विरोधात लागला तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल तसेच आपले आमदारकी ही रद्द होईल असा काहीसा विचार त्यांच्या मनात असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या निकालाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. कोर्ट जी ऑर्डर देणार त्या ऑर्डरचं देशातील नागरिक पूर्ण सन्मान करणार. जो व्यक्ती संविधानावर लोकशाहीवर विश्वास ठेवतो तो संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवरही विश्वास ठेवतो, असं नार्वेकर म्हणालेत.
अध्यक्ष म्हणून मी जबाबदरीपूर्वक काम करत आहे. केवळ उद्यासाठीच नव्हे तर अध्यक्ष झाल्यापासूनच जबाबदारीने काम करतोय. मी कायमचा परदेशात जात नाहीये. दोन ते तीन दिवस फक्त जात आहे, त्यामुळे सुनावणी आणि सर्व व्यवस्थित पार पडेल, असंही नार्वेकर म्हणालेत.
16 आमदारांना अपात्र केलं गेलं तत्कालिन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं गेलं तेव्हा मी कुठल्या आकसापोटी हा निर्णय घेतला नाही. तर कायद्याच्या आधारेच या आमदारांना अपात्र केलं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की मी दिलेला निर्णय न्यायदेवता मान्य करेन, असं झिरवळ म्हणाले आहेत.
सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल लागणार आहे तर आता 24 तास थांबायला पाहिजे. आता निर्णय लवकर देणार आहे. एवढे महिने आपण थांबलेलो आहे. तर आणखी 24 तास थांबूयात. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Sanjay Raut संजय राऊत : न्याय यंत्रणा स्वतंत्र आहे की नाही, याचा फैसला उद्या होईल
संजय राऊत यांचे सूचक विधान
या देशात लोकशाही आहे की नाही हे समजेल
देश संविधानानुसार चालतोय का?- राऊत
आम्ही आशावादी आहोत
आमचा संविधानावर विश्वास, निकालाची धाकधूक नाही – आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री असंवैधानिक आहेत 24 तास थांबा