जामखेड प्रारुप विकास आराखडा कृती समितीच्या वतीने आज रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ‘चला जामखेड वाचवू “या धोरणामुळे प्रारूप विकास आराखडा अन्यायकारक आहे.असे मत प्रा.मधुकर राळेभात म्हणाले .
उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी प्रा. मधुकर राळेभात,अमित चिंतामणी,अॅड. शमा हाजी काझी,विनायक राऊत,आकाश बाफना,राहुल उगले, अविनाश साळुंके ,अमोल गिरमे ,अशोक जावळे, डॉ. संजय राऊत, राजेंद्र देशपांडे ,सय्यद जावेद , विजय गव्हाणे, गौतम बाफना आदी जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते.
जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते.पंरतु जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर भकास करण्याचा हा आराखडा आहे. जामखेड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासीयांच्या विरोध असून या आराखड्या विरोधात जामखेडकर जन आंदोलन उभे करत आहेत, जामखेड शहरातील किमान १५००० लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगर परिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे आणि यासाठी समस्त जामखेडकर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करुन जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावर नव्याने आराखडा बनवावा ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आज सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय समोर येथे सुरू करण्यात आले. तसेच उद्या मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखेड बंद चे आवाहन करण्यात आले आहे. जामखेड कृती समितीने म्हटले आहे की, नगर परिषदेचा प्रारूप विकास आराखडा बेकायदेशीररित्या पार झाला व तो करताना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेने केला व अद्याप करीत असल्याने सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी उपोषण व धरणे आंदोलन तर मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखेड बंदचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रारूप विकास आराखडा दुरुस्त करण्यासाठी जामखेड कृती समिती स्थापन करण्यात येऊन तिच्या तर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
जामखेड नगरपरिषदेने प्रशासकांनी फक्त कलमं पुढे केली व त्यातील मुदती वाढवून लावल्यामुळे कृती समितीच्या वतीने उद्या जामखेड बंद चे सदरचा आराखडा हा सदोष व बेकायदेशीर झाला असून तो बळजबरीने लागू करू पाहत आहे त्यासाठी जामखेड वासियांना आंदोलन करण्याची वेळ आली असल्याने सदर प्रारूप नगर रचना आराखडा सुधारित करावा अथवा रद्द करावा.उद्या मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जामखंड बंदची हाक देण्यात आली आहे.