राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता लवकरच Maharashtra cm शपथविधी होणार आहे. मंगळवारी शपथविधी होणार असून किती मंत्री शपथ घेणार आहेत याची माहिती ही समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे. ज्यावर आज रात्रीपर्यंत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहेold car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 मंत्री शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रवादीचे ही पाच मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्षाने संभाव्य आमदारांची नावे दिल्लीत पाठवली होती. ज्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे.
Maharashtra cm | कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ?
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, संग्राम जगताप, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे. पहिल्या टप्प्यात असे एकूण 20 मंत्री शपथ घेणार आहेत.
भाजप सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागा तर राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचे जास्त मंत्री असतील. त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार या्ंच्या राष्ट्रवादीचे मंत्री असतील. मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही शक्यता आहे.
Table of Contents
मुख्यमंत्री कोण होणार?
राज्यात महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमताच्या जोरावर उद्या नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. आज रात्री महायुतीतील तिन्ही पक्षाचे मोठे नेते दिल्लीत येऊ शकतात. उद्या शपथविधीवर यामध्ये महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. Maharashtra cm मुख्यमंत्री कोण होणार याबाबत ही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या Maharashtra cm बाबतीत सर्वात प्रबळ दावेदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी महायुतीने निवडणूक लढवली असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व सूत्र होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या रणनीतीने भाजप आणि महायुतीचे रेकॉर्ड ब्रेक असे उमेदवार निवडून आणले आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते. पण पुन्हा एकदा त्यांना जनतेने जनाधार दिल्याने ते या शर्यतीत आघाडीवर आहेत.