जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
Manipur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मणिपूर घटनेचा निषेध केला
देशातील मणिपुर Manipur सारख्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता आहे. घरे जाळली जात आहेत. माणसे मारली जात आहेत. त्यावर कळस म्हणून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली जात आहे. आणि सारा देश हे षंढा सारखे मोबाईल मध्ये पाहत आहे. या देशाचे पंतप्रधान-गृहमंत्री हे मूग गिळून शांत आहेत. कसले हे राजकारण कसले हे समाजकारण एवढा लाजिरवाणेपणा घेऊन जगणे हे षंढाचे लक्षण आहे.

Table of Contents
स्त्री ही कोणाचीही असो तिचा एवढा अपमान/ अवमान उघड्या डोळ्याने पाहावत नाही आम्ही सर्व त्या असाह्य महिलेसोबत आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही रास्त्यावर येणार. Manipur स्त्री वर सामूहिक अत्याचार करत आहेत त्यांना कडक शासन किंवा फाशी द्या. नाहीतर या देशाचे समाजकारण, राजकारण सोडून द्या. या भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत/जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या भारत देशामध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेचा सन्मान वाढवण्याचे काम केले. म्हणून ते आदर्श राजे झाले .ज्यांचे नाव आदराने पूर्ण भारत वर्षात घेतले जाते.भारत या देशाला कोणी हिंदुस्तान म्हणते, कोणी इंडिया म्हणते, सोने की चिडिया है मेरा देश असे बिरूदी लावली जाते. त्याच देशातील मणिपुर Manipur सारख्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून अशांतता आहे. घरे जाळली जात आहेत. माणसे मारली जात आहेत. त्यावर कळस म्हणून महिलेची निर्वस्त्र करून धिंड काढली जात आहे

आणि सारा देश हे शंडा सारखे मोबाईल मध्ये पाहत आहे .या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री हे मूग गिळून शांत आहेत .कसले हे राजकारण कसले, हे समाजकारण एवढा लाजिरवाणेपणा घेऊन जगणे हे षंडाचे लक्षण आहे .स्त्री ही कोणाचीही असो तिचा एवढा अपमान/ अवमान उघड्या डोळ्याने पाहावत नाही आम्ही सर्व त्या असाह्य महिलेसोबत आहोत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही रस्त्यावर येणार. देशाच्या पंतप्रधानांना विनंती व सरकारला विनंती करतो , थोडीफार जर शिल्लक असेल तर मणिपूरमध्ये Manipur राष्ट्रपती राजवट लागू करा. ज्या स्त्री वर सामूहिक अत्याचार करत आहेत त्यांना कडक शासन किंवा फाशी द्या. नाहीतर या देशाचे
समाजकारण ,राजकारण सोडून द्या.
कधीच नव्हते ते भ्याड आणि शरमेने मान खाली जाईल असे कृत्य या देशात होत असताना तुम्हा लोकांना त्याचा संताप कसा येत नाही? जनावरा इतका ही माणसाला न्याय मिळत नसेल तर ती कुठली महासत्ता. “धर्म जात वंश” यातच सर्वांना जाळणार आहात काय? असा सवाल प्रा. मधुकर राळेभात यांनी उपस्थित केला आहे
