मनोज जरांगे Manoj Jarange यांच्या रूपात मराठा समाजाला एक लढाऊ नेता मिळाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण कि आत्तापर्यतच्या इतिहासातील सर्वात मोठे उपोषण आणि त्यानंतर गावागावात , तालुक्यात तसेच जिल्ह्यात त्यांच्या ज्या सभा झाल्या , व त्या सभेतील गर्दी हे पाहता आत्ता मराठा समाज पून्हा एकदा एकत्रित आलेला पाहायला मिळत आहे .
मनोज जरांगे Manoj Jarange आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार

आंतरवली या गावात उपोषण चालू, सुरवातीचा काळ कठीण होता, परंतु गावकऱ्यांनी केलेली मदत , तसेच तालुक्यातून , अनेक जिल्ह्यातून मला जो सखल मराठा समाजाने जो पाठींबा मिळत होता , यावेळी मनोज जरांगे Manoj Jarange पाटील म्हणाले कि, या तुम्हा सर्वांचा जो पाठींबा मिळत होता हे पाहून मला लढण्याची ताकत मिळत गेली
मनोज जरांगेंनी Manoj Jarange शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एका समितीची स्थापना केलेली आहे. सरकारला आरक्षण द्यावंच लागले, त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाहीये, असं म्हणत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी Manoj Jarange शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
Table of Contents
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारवर माझा विश्वास आहे, त्यांनी मला ४० दिवसाचा वेळ दिला होता, तो मी त्यांना दिला आहे आत्ता वेळ आहे ती आरक्षण देण्याची सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची, त्यांनी काय विचार केला असेल तो असेल आपण आरक्षण घेणार म्हणजे घेणार , जर सरकारने यात काही छक्के पंज्जे केले तर हा मराठा समाज गप्प बसणार नाही, जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाज आंतरवली मध्येच राहील मंग बघू कसे आरक्षण मिळत नाही ,

सरकारने मराठा समाजाला ४० दिवस दिले आहेत आणि धनगर समाजाला ५० दिवस दिले आहेत , यावर बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, आम्ही जर दोघे एकत्र आलो तर या सरकारचे काय होईल याचा विचार करावा, आम्ही कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाहीत, आमचे जे ओबीसी मधील वाढीव आरक्षण आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे, कारण ते आमच्या हक्काचे आहे
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापुरमध्ये त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. सरकारने येत्या ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे. हैदराबादेतून आलेल्या पथकाने ५ हजार नमुने दिले असून ते समितीकडे पाठवण्यात आल्याचंही मनोज जरांगे Manoj Jarange पाटलांनी म्हटलं आहे.
