भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना भारतातील रस्त्याबाबत मोठे विधान केलेलं आहे , नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजपाचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते सध्या मोदी मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते १९७६ साली अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.१९८९ साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. पुढे २० वर्षापर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलेलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा म्हणजेचं म्युझिकल फाउंटन तयार करण्यात आला आहे.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या भन्नाट उपाययोजना नेहमीच सामान्य नागरिकांकडून उचलून धरल्या जातात. प्रवासाचा वेळ कमी करणे असो किंवा इंधनांचे दर वाढत असताना हायड्रोजन कार सारखा हुकुमी एक्का बाहेर काढणे असो गडकरींचे निर्णय भारतीयांच्या हिताचे सिद्ध झाले आहेत
बहुमजली रस्ते जे सहसा आपण परदेशात चित्रित केलेल्या सिनेमात पाहिले असतील त्यांना भारतात बांधण्याचा गडकरींचा प्लॅन आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्यांवर मोठे समाधान मिळू शकेल. सध्या नागपूरमध्ये अशा प्रकारची रस्ते बांधणी पाहायला मिळते. असेच काम चेन्नई व जोधपूर मध्येही सुरु आहे.

देशात लडाख ते कन्याकुमारी रस्त्यांचे उत्तम नेटवर्क तयार करण्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) चा भर आहे, याशिवाय भारताच्या सीमांवर होणाऱ्या रस्ते वाहतुकीसह हेलिकॉप्टर व लढाऊ विमाने उतरवता येतील अशा गुणवत्तेचे रस्ते तयार करण्यावर भर दिला जात आहे.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यानी नऊ वर्षांपासून वेगवेगळ्या विभागांचा मंत्री असून रस्त्यासह पायाभूत सोयीशी संबंधित विविध विभाग सांभाळले आहे. या सर्व क्षेत्रात मी ५० लाख कोटींची कामे केली आहे, मात्र पारदर्शकता ठेवून आणि कुठेही भ्रष्टाचार होऊ दिला नाही. एकाही कंत्राटदाराला घरी बोलावून कामे दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे जरी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते असले तरी, त्यांना प्रत्येक पक्षातील राजकीय मंडळी आदर देत आहे , कारण त्यांची काम करण्याची पध्दत हि अखंड महाराष्ट्राला माहित आहे, ते कोणाकडून एक रुपयाही घेत नाही, किंवा ओळखीचा आहे म्हणून] काम किंवा कॉन्ट्रॅक्ट देत नाहीत, त्यांनी हे खाते स्वीकारल्या पासून रस्ते बांधणे तसेच रस्ते वाहतुक तसेच दळणवळण या क्षेत्रात उल्लखनीय काम केले आहे,
भारताने केलेल्या या कामगिरीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाष्य केले आहे. त्यावेळी बोलताना ते म्हटले कि , सन २०२४ पर्यंत भारतातील सर्व रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांना माघे टाकतील आणि भारत हे जगातील रस्त्याच्या कामाच्या बाबतीत भारत अमेरिकेला माघे
टाकत एक नंबरचा देश तयार होईल, असे आशा भाष्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे
