राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. येत्या चार पाच दिवसांत तो संपुर्ण राज्यात दाखल होईल. शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पाऊस सुरु झाला होता. शनिवारी मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर या भागात पाऊस झाला आहे. हलक्या सरी कोसळत असून अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख panjabrao dakh यांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून आता राज्यातील बऱ्याचशा शेतकरी सुखावला आहे.

राज्यात पुढचे 5 दिवस धो-धो पावसाचे अंदाज वर्तविले असून कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे सातारा नाशिक भागात सुध्दा मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडामध्येही पावसाचा जोर राहील, असा अंदाज पंजाबराव डख panjabrao dakh.यांनी वर्तविला आहे. तथापि पुढील पाच दिवसांत महाराष्ट्राचा बहुतांश भाग मान्सून व्यापणार आहे. आषाढी एकादशी यंदा पावसात साजरी होणार असून पुढचा आठवडा पावसाचा असणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होणार आहे.

panajabrao dakh पंजाबराव डख यांनी दोन दिवसापूर्वी मान्सून बाबत अंदाज व्यक्त केला होता यामध्ये त्यांनी सांगितले होते की, 24 जून 2023 रोजी महाराष्ट्रात मान्सून चे आगमन होईल, तसे न झाल्यास मी अंदाज वर्तविणे सोडून देईल त्या प्रमाणे खरे झाले पुन्हा एकदा पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला आहे.
पेरण्या खोळंबल्या..
राज्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. शुक्रवारपासून काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदुर मुसळधार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना सुरूवात होईल. जोवर 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्यांसाठी घाई करू नये, असे पंजाबराव डख panjabrao dakhयांनी म्हटले आहे.
