Sambhaji Bhide संभाजी भिंडेंच तोंड आवरेना.?
शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. संभाजी भिडे यांच्यावर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटले.

परत एकदा संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी संपूर्ण देशाचे दैवत समजले जाणाऱ्या आणि अहमदनगर जिल्ह्याची ओळख ज्या शिर्डी येथील साई बाबा मुळे आहे, त्यांच्यावर बोलतानाही भिडे याची जीभ घसरली पाहायला मिळत आहे, यावेळी त्यांनी असे म्हटले की, आपला हिंदू समाज ज्या साईबाबालापुजतो त्या साईबाबांची लायकी काय ते तपासा आणि सर्वप्रथम त्या साईबाबाला घरातील देव्हाऱ्यातून बाहेर फेका, मी हे खूप जबाबदारीने बोलतोय असे सुद्धा यावेळी बोललेले पाहायला मिळत आहे.
Nitin Desai | नितीन देसाईंनी सरकारकडे केली होती मोठी विनंती; पण ती नाही झाली मान्य..

अनेक ठिकाणी भिडे Sambhaji Bhide यांनी साईबाबा विषयी वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला आहे, परंतु नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी यावर आपली अद्याप पर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील महिलांना मोफत साई बाबा दर्शन फ्री मध्ये घडवत आहेत, अनेक तालुकयातून तसेच नगर शहरातून बसेस फुल्ल भरून साई बाबाच्या दर्शनाला घेऊन जात आहे, त्यांची श्रद्धा साई बाबावर असेल म्हणूनच ते नगर जिल्ह्यतील महिलांना दर्शन घडविताना पाहायला मिळत आहेत
Table of Contents
परंतु विखे पाटील संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतात की , समर्थन करतात हे पाहणे महत्वाचे आहे कारण विखे हे साईच्या दरबारी जाऊन दर्शन घेतांना सर्वानी पाहिलेले आहे, एवढेच नाही भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेते शिर्डी आले कि, त्यांना साईबाबाच्या दर्शनाला घेऊन जातात असतात, पण भिडे यांनी केलेल्या त्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात कि नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई का होत नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे गुरुजींवरही तातडीने कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील केली होती पण आत्ता विखे पाटील का गप्प आहेत ?
नगर जिल्ह्यात भिडे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा साई भक्तांनी निषेध केला आहे, तसेच काँग्रेसच्या काही पधाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे, मात्र पालकमंत्री यांनी मौन धारण केलेले पाहायला मिळत आहे , पण नगर जिल्यातील महिलांना साई दर्शन फ्री, मध्ये घडवत आहेत, आता ते भिंडे यांना काही प्रतिउत्तर देतात कि नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, विखे पाटील संभाजी भिडे Sambhaji Bhide यांचे समर्थन करणार का ?