महालोकवाणी न्यूज:
सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.

नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते?
जेठमलानी: 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले.. तर स्पीकरला आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार होता का?
कोर्ट : सात सदस्य खंडपीठाकडे पाठवायचे की नाही?
जेठमलानी – विधानसभा उपाध्यक्ष वतीने पाठविण्यात आलेले नोटीस यांची सत्यता तपासण्याची गरज आहे
अविश्वास ठराव आणलेले आमदारांच्या स्वाक्षरी तपासल्या तर त्या खऱ्या ठरतील कारण त्या विधी मंडळाच्या रजिस्टरमध्ये पाहता येणार आहे
कोर्ट – मुद्यावर बोला, राज्यात काय घडलं याची माहिती आम्हाला कालच मिळाली
जेठमलानी – नऊ दिवसांत सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जूनला नाकारण्यात आली. महेश जेठमलानी यांचा कोर्टात युक्तिवाद. मेलवरच्या अविश्वास प्रस्तावाला महत्त्व नाही, असे अध्यक्ष म्हणाले
कोर्ट – आम्हीच वेळ वाढवून दिली होती, महाराष्ट्राचे प्रकरण सात सदस्यांचा घटनापीठाकडे पाठवायचे का, युक्तिवाद करा, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना.
जेठमलानी: शिंदे यांच्या मुलांचे कार्यालय जाळण्यात आले आणि आम्हाला सांगण्यात आले की आम्ही मुंबईत आलो तर आमचे मृतदेह स्मशानभूमीत पाठवले जातील. म्हणूनच आम्ही गुवाहाटीला गेलो.
पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आहे. कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिउत्तर देण्यात आले. हा निकाल केव्हा समोर येतो हे पाहण आता महत्वाचे आहे. सलग तीन दिवस युक्तीवाद झाले मात्र निर्णय राखून ठेवला आहे. 7 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण जावे अशी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
