धनराज पवार
जामखेड येथे रविवार दिनांक २३ जुलै रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज्य रॅलीचे खर्डा चौकात जोरदार स्वागत स्वागत करण्यात आले , पक्ष वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जण स्वराज्य रॅलीचे संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज राष्ट्रीय समाज हा कार्यकर्त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही रथयात्रा करतोय त्या माध्यमातून जागृती करण्याची भूमिका आहे . आता मी एनडीए मध्ये आहे आपल्याला आपला पक्ष वाढवला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला काय वाटते हे जाणून घेणे महत्वाचे असते

मी स्वतः परभणीतून लढणार आहे माढ्यातून लढणार आहे बारामतीतून तयार केलेले आहे आणि मी आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपला पक्ष वाढविणे महत्वाचे आहे छोटे राजकीय पक्ष हे लोकांचे काम करत असते , आम्हाला माहित असते लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत , नॅशनल पक्षाला काय माहित नसते खाली काय प्रोबेलम चालू आहेत, या रॅलीत आम्हाला सर्व पक्षाचा पाठींबा मिळत आहे

माझे आराध्य दैवत हे चौंडी आहे असे जानकर यांनी सांगितले , एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान होणार असे यावेळी त्यांनी सांगितले , यावेळी काही पत्रकारांनी त्यांना जामखेड तालुक्यात ज्या विनयभंगाचे प्रकरण घडले त्या विषयी विचारले असता अश्या घटना करणाऱ्या नराधमाला कठोर शासन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले

यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, केंद्रीय सचिव सुशील कुमार, मुख्य महा सचिव माऊली सलगर,महाराष्ट्र सचिव रविंद्र कोठारी,जिल्हा अध्यक्ष शहाजी कोरडकर,लोकसभा अध्यक्ष आत्माराम कुंडकर ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, उत्तर चे जिल्हा अध्यक्ष नाना जुंधारे ,महिला जिल्हा अध्यक्ष मंदाकिनी बडेकर ,उत्तर जिल्हा अध्यक्ष सुवर्णा जराड ,युवक अध्यक्ष विकास मासाळ ,तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, युवक अध्यक्ष नंदकिशोर खरात ,गणेश सुळ, आनंद खरात,संपर्क प्रमुख हनुमंत निकम महाराज,पै सुरज पवार, अनिल श्रीरामे , ॲड. मोहन कारंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संभाजी ब्रिगेडचे आण्णासाहेब सावंत यांनी सत्कार केला पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
