केसरीवाड्यातील बैठकीत गिरीश बापट बुधवारीआले तेव्हा त्यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. व्हिलचीअरवर बसून त्यांना आणण्यात आले. यावेळी अंग थरथरत होते. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, गेली तीन महिने प्रकृती बरी पण मी खूप कमी काम केलंय. मला दोन ते तीन वेळा डायलिसिस आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. या निवडणुकीत मी वैयक्तिकरित्या फिरून प्रचार करू शकणार नाही.

महिलांना अश्रू अनावर
केसरी वाड्यात गिरीश बापट बैठकीला हजर झाले. बैठक भावनिक झाली होती. व्हिलचेअरवर असलेल्या बापट यांनी छोटे भाषण केले. ते ऐकताना पदाधिकारी गंभीर झाले होते. गिरीश बापट यांचे भाषण सुरू असताना महिलांना अश्रू अनावर झाले.
काय आहे बापट यांचे महत्व
भाजपने टिळकांच्या कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे कसबा पेठेत ब्राह्मण समाजात तीव्र नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गिरीश बापट यांची भेट घेतली त्यानंतर बापट मैदानात उतरले. बापट या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे
पुण्यात कसबा आणि लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्याच्या जागेवर काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलाय. तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलीय. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी, टिळक कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे कसब्यातील राजकीय घडामोडी चर्चेत आल्या होत्या. आता गिरीश बापट मैदानात उतरल्याचा फायदा भाजपला किती होणार हे मतमोजणीला स्पष्ट होणार आहे.
