जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार
जामखेड : जामखेड शहरातील प्रसिद्ध असलेले व्यापारी मा. प्रफुल सोळंकी यांनी एम.एस.ई.बी (MSEB) च्या गलथान कारभारामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे असे उद्गार रोजी व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून याबाबत माहिती अशी की, मीटर वरील रीडिंग न जुळवता आवाचे सव्वा कर आकारले जातात.
नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !
अंदाजे लाखोचे बिल देऊन व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार करतात नंतर सेटलमेंट करून बिल कमी केले जाते पण जे लोक कुठलीही शहानिशा न करता बिल भरत असतील त्यांच्यावर किती मोठा अन्याय होत असेल.. स्वतः त्यांनी अनुभवले आहे असे मत मा.प्रफुल सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.

सोळंकी पुढे बोलताना म्हणाले की, याकडे सामान्य नागरिक व पत्रकारांनी लक्ष घालावे. वेळोवेळी तक्रार घेऊन गेल्यावर अधिकारी लोक आपला टाईमपास करतात आणि नंतर अचानक जास्त बिल देऊन समोरील व्यक्तीला किंवा ग्राहकाला आपले कुठलेही म्हणणे मांडू न देता लाईट कनेक्शन कट करण्याची भाषा करतात.कसलीही शहानिशा न करता अनोळखी लोक आणून व कर्मचारी आणून दमदाटीची भाषा केली जाते यांनी केलेली चूक म्हणजे चूक नसते.
परंतु यांच्या चुकीमुळे समोरच्या ग्राहकाला वेळोवेळी लाईट बिल भरायची इच्छा असली तरी ,यांच्या गलथान कारभारामुळे तो भरू शकत नाही आणि तीच चूक त्याच्या माथी मारून लाईटवर अवलंबून सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची व लाईट कनेक्शन तोडण्याची भाषा करुन अतिशय दमदाटीमध्ये केली जाते जसे की यांना हे अधिकार कोणी दिलेले आहेत असा सवाल त्यांनी यावेळी केला.
