महालोकवाणी न्यूज:- विजय मते
नगर – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रजासत्ताक दिनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आदर्श घटना दिली. आपले संविधान म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक मुल्य तसेच विचारांची अभिव्यक्ती आहे. भारतीय लोकशाहीजगातील इतर कोणत्याही शासन पद्धतीपेक्षा सरस आहे, या संविधानांचे संरक्षणाबाबत सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे यांनी केले.
सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्त सैनिकांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. याप्रसंगी निवृत्त सुभेदार मेजर डी.एन.तांदळे, निवृत्त सुभेदार संजय डोंगरे, निवृत्त सुभेदार विनायक मोराळे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार उपस्थित होते.
‘प्रकाश आंबेडकरांना खासदार शरद पवार कळलेच नाहीत’, आमदार रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया !
कर्नल नागरे यांनी 1971 च्या युद्धात आम्ही लढलो, शत्रूवर विजय मिळविला. देशसेवा करतांना जीवन खर्या अर्थाने सार्थक झाल्याचे समाधान लाभले, असे सांगितले. सुभेदार डी.एन.तांदळे म्हणाले, प्रतिष्ठानच्यावतीने चौकात हा उपक्रम राबवून देशावरअसलेले प्रेम व्यक्त होते.या सामुहिक ध्वजारोहण कार्यक्रमास लिटिल चॅम्स् प्रायमरी स्कूल व मतिमंद मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांनी चौकांत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याने उपस्थितांची मने जिंकली.

नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन चौकात साजरा करण्यामागे आपली संस्कृती, देशप्रेम व्यक्त करुन विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम नियमित राबवत असल्याचे सांगितले.
यावेळी अविनाश निक्रड, अमर मेट्टू, राजू दिलावर शेख, लिटिल चॅम्प्स फ्री स्कूलच्या प्रिन्सिपल प्रीती गुलाटी, मतिमंद मुलांची निवासी शाळेच्या प्रा.कल्पना भनगडे, वनसंरक्षक राजश्री राऊत-पिंपळे, राम ढुमणे, वडागळे मॅडम उपस्थित होते. यावेळी रेश्मा पवणे यांनी सुंदर अशी रांगोळी काढली. पुष्पा राऊत,आव्हाड मॅडम यांनी देशभक्तीपर गाणे सादरीकरण केले. सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी योगेश पिंपळे यांनी आभार मानले.
