Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सर्वसमाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख – डॉ.उदय नाईक

सर्वसमाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख – डॉ.उदय नाईक

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्वातून बुद्धीमत्ता, व्युहरचना, साहस, मानवतावादी दृष्टीकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. महाराजांनी संकुचितपणा, भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा अशीच ओळख जगाला करुन दिली. त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उदय नाईक, शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे, डॉ.एस.ए.मरकड, डॉ.के.बी.काळे, डॉ.आर.आर.नवथर, प्रा.निळकंठ देशपांडे, प्रा.आर.एस.तांबे, प्रा.अविनाश पुंड, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल छाईलकर, वैष्णवी ढाकणे, मुस्कान शेख उपस्थित होते.


डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन करुन विळदघाट येथील महाविद्यालयापर्यंत पायी शिवज्योत आणली. प्राचार्य व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी या ज्योतीचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयघोष करण्यात आला.


डॉ.नाईक यांनी मार्गदर्शन करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक दिवस हा आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी शिवराय अंगिकारणे गरजेंचे आहे. अशी महान विभुती पुन्हा होणे नाही. महाराजांचे विचार, सर्वसमावेशकता यातून सध्याच्या तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.
शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणार्या विद्यार्थी संघटनांचा गौरव महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमास फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर प्रा.सुनिल कल्हापुरे, प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleछत्रपती शिवाजी महाराज एका समुहाचे नसून अखंड महाराष्ट्राचे दैवत- विकिभाऊ सदाफुले
Next Article गेवराई तालुक्यातील तरुणांच्या स्वरचित कवितेला मिळाला मैत्री प्रकाशन बुलढाणा यांच्या पुस्तकात स्थान..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.