जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
स्पर्धा परीक्षा करत असताना आपण नियमित व सखोल वाचन केले पाहिजे. त्याच बरोबर सतत शिक्षण घेवून उच्च विद्या विभूषित झाले पाहिजे .स्पर्धा परीक्षा करत असताना संयम महत्त्वाचा असून योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेत अपयश आले तर दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले

जामखेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे शांत व प्रसन्न ,वातावरण, विविध प्रकारची पुस्तके, वर्तमानपत्रे मासिके व इतर सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या दरमहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘अधिकारी आपल्या भेटीला, या उपक्रमाचे कौतुक केले.जामखेड नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी एन. सी. सी. ऑफीसर श्री मयूर भोसले सर, स्काऊट मास्टर श्री शिंदे बी. एस.सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ शिंदे सर केले व उपस्थित सर्वांचे आभार देवा देवकर यांनी मानले.
