महालोकवाणी न्यूज:-
जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवार
गेल्या वर्षभरापासून जामखेड – पाटोदा(ग) रोड चे काम प्रगती पथावर असून, कामाच्या ठिकाणी, संम्बधित ठेकेदार कंपनीकडून, कसल्याही प्रकारचे काम चालू असल्याचे व वाहतूक नियमांचे फलक लावलेले नाहीत, त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत आहे, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे.

हे पण वाचाच :-
नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !
पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, मागील काही दिवसात, यामुळेच. चंदु मंडलिक (जवळका) यांचा मृत्यू झाला होता. तसेच बबन मेंगडे,भिमाबाई मेंगडे हे मोटरसायकल वरून जात असताना अचानक दिसलेल्या ढिगाऱ्यावरून गाडी घसरून अपघात झाला त्यात, भिमाबाई या आज रोजी अहमदनगरला अॅडमिट आहेत.

अश्याच प्रकारे वैभव चेमटे हे अपघात होऊन जामखेड येथे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहेत, जमीर पठाण, दादा खवळे हे ही याच मार्गामुळे अपघात ग्रस्त आहेत, वरील सर्व अपघात हे केवळ फलक नसल्यामुळेच घडले आहेत. जामखेड – कर्जत – श्रीगोंदा रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार यांनी घेतले असून रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकले आहेत.या रस्त्याने येजा करणारे प्रवासी यामध्ये मोटार सायकल तसेच इतर वाहनांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. रात्री अपरात्री गाडी ना हा ढिगारा दिसत नाही व अपघात होतात पंरतु रस्त्याला कोणताही फलक नाही की, पुढे काम चालू आहे फलक लावण्यात आले नाही
Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा
आजतागायत कितीतरी अपघात झाले आहे तसेच या अपघाता मध्ये रत्नापूर फाटा येथे चंदू मंडलीक यांचा मृत्यु झाला.संम्बंधित ठेकेदाराने लवकरात लवकर मुरुमाचे ढिगारे व गतिरोधक आहेत ते काढून प्रवासांच्या हितासाठी काम करावे अन्यथा रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिला आहे.
