नगर शहरात धर्मांतरणाच्या विरोधात रविवारी (दि. २२ जून) सकाळी १० वाजता एक जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ऋतुजा सुकुमार राजगे यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर घेतला जात आहे.
ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी
ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित, विवाहित आणि गर्भवती महिला होत्या. धर्मांतरणासाठी होणाऱ्या मानसिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मोर्चात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप करणार असून, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षाताई डहाळे प्रमुख वक्ते म्हणून आपले विचार मांडणार आहेत.
Table of Contents
मोर्चाचे आयोजकांनी नागरिकांना शांततेत आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
