अहमदनगर जिल्ह्यात महिला सरपंचावर प्राणघातक हल्ला.!
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जुलै):-अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाराज crime सुरू असल्याची घटना आता समोर आली आहे पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील महिला सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाला आहे.
ही घटना आज शनिवारी दि.२२ जुलै रोजी अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून गाव दहशतीखाली आलेले आहे. एका टोळी कडून धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून सदर घटनेत त्यांचे पती संतोष घोरपडे,दिर बापू घोरपडे , सासरे भाऊसाहेब घोरपडे, रोहित घोरपडे,रोहन घोरपडे, जाव वनिता घोरपडे हे संपूर्ण कुटुंब गंभीर जखमी झाले आहे.
जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार
Table of Contents
अद्यापही अहमदनगर Ahmednagar पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप सरपंच घोरपडे यांनी केला आहे तर याआधी देखील माझ्या कुटुंबीयांवर याच गावगुंडांनी माझ्यावर अनेकदा हल्ले केल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत.या सर्व जखमींवर नगर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.