महालोकवाणी न्यूज: ब्लॅकमेलिंगचा प्रयत्नअमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका फॅशन डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली. माझ्या पत्नीने या प्रकरणाचा एक एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी आहे. शिकलेली आहे. हुशार आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021 मध्ये या…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज: जामखेड तालुक्यातील एका सामान्य कुटूंबातील व्यक्तीमत्व असणारे निलेश भाऊ गायवळ हे पुणे येथे कामानिमीत्त गेले, आणि त्यांनी पुणे येथे आपल्या सामाजिक , राजकीय जीवन जगत असताना त्यांनी अतिशय खडतर जीवन जगत असताना , मार्ग काढत आपले पुणे येथे आपले साम्राज्य निर्माण केले, त्यांनी सामजिक क्षेत्रात पण उत्तम कार्य करत गोरगरीब लोकांना मदतीचा हात देत असतात निलेश (भाऊ ) गायवळ यांच्या वाढदिवसाला त्यांचे असंख्य असणारे कार्यकर्ते हे सामाजिक भान जतन करत भाऊंचा वाढदिवस हा गोरगरीब लोकांना मदत करत , किंवा गोशाळेत चारा वाटप करत, तसेच अनाथ मुलांना मदत करत , साजरे करत असतात , निलेश भाऊंच्या वाढदिवसानिमीत्त अहमदनगर येथील…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठाण संचलित साकेश्वर गो – शाळा येथे सामाजिक कार्यकर्ते मा.निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसा निमित्त ७० गायींना ३ दिवस पुरेल इतका हिरवा चारा देण्यात आला. याप्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठाण चे तालुका अध्यक्ष पांडूरंग भोसले,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले,रमेश बोलभट (सर),बापू कदम ,समीर गायकवाड , भरत वाघुले निखिल आरडे , हर्षद ढाळे,विशाल दौंड, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, किशोर गायवळ,खंडागळे नाना, शिंदे बी.एस, मयुर भोसले,संतोष पवार ,पुलावळे महाराज, तुषार बोथरा, अभिमन्यू पोते आदी उपस्थित होते. प्रहार चे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांनी निलेश भाऊ हे नेहमी सामाजिक उपक्रम अग्रेसर असतात त्यांचे…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार कर्जत आणि जामखेड (Karjat-jamkhed) या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यास उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी आज विधानसभेत केली. वाहतुकीचा भंग करणे, चोरी, महिला आणि मुलींची छेडछाड यासह इतर गुन्ह्यांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्याचीही विनंती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ५ डिसेंबर २०२२ रोजी…
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार दिनांक 14/03/ 2023 रोजी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गुगळे यांचा वाढदिवस श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. निवासी मुक बधिर विद्यालयात येथे वाढदिवसा निमित्त किराणा साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केले, आपला वाढदिवस निवासी मुक बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये साजरा करून मुलांना एक आगळावेगळा आनंद देण्याचा सामाजिक उपक्रम दिलीप गुगळे यांच्या माध्यमातून घेण्यात आला.अनाथ निराधार,मुक – बधिर या लोकांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.मुक बधीर विद्यालयातील मुलांना खूप चांगल्या प्रकारे येथील शिक्षक सांभाळत आहेत. त्यांचे…
महालोकवाणी न्यूज : राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती. निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती चे १४/०३/२०२३ पासून बेमुदत संप सुरू अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लॉ कॉलेज शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र बालक मंदिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बेमुदत संप सुरुवात. यावेळी प्रा. विलास वाळुंजकर प्रा.राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा.आप्पासाहेब पोमणे,प्रा.मोहन कांजवणे,प्रा.भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा.…
महालोकवाणी न्यूज: आमदारांचे पत्र हे बहुमत चाचणीसाठी पुरेसे कारण नाही. उर्वरित कारणांवर चर्चा करा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी राज्यपालांपासून ते बंडखोर आमदारांपर्यंत आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आमदारांचे पत्र हे बहुमत चाचणीसाठी पुरेसे कारण नाही. उर्वरित कारणांवर चर्चा करा, असे निर्देशच सरन्यायाधीशांनी दिले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. आज राज्यपालांच्या वतीने महाअधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. तुषार मेहता यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते. मात्र, अशा पद्धतीने विश्वासमत मागणे लोकशाहीसाठी घातक…
पाथर्डी
iphone
मुंबई : मुंबई येथील मालाडमध्ये मोठी घटना घडली आहे. एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे “मुंबईतील मालाड पूर्व , आप्पा पाडा येथे सोमवारी ५०० हून…