महालोकवाणी न्यूज:- दि. ७ फेब्रुवारी 2023 धनराज पवार जामखेड प्रतिनिधी जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विविध विकास कामे व्हावीत, यासाठी आमदार राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला निधी मंजुर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार संबंधित विभागाने कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 4 कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये जामखेड तालुक्यासाठी दीड कोटी तर कर्जत तालुक्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजुर झाला आहे. सदरचा निधी मंजुर होताच मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज :- जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार जामखेड नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष माननीय विकास तात्या यांच्या आई कै. रतनबाई भगवंत राळेभात यांचे 12 वे पुण्यस्मरण दिनांक 07/02/2023 रोजी योजिले आहे , त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी यावे कै. रतनबाई राळेभात यांच्या 12 व्या पुण्यतिथी निमीत्त संध्याकाळी भजन आयोजित करण्यात आले आहे, लेहनेवाडी, भुतवडा रोड, राळेभात पाटील वस्ती, ता. जामखेड संपन्न होईल, तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी दुपारी 12 ते आपल्या आगमना पर्यंत जेवणासाठी हजर राहावे असे आव्हान श्री. भगवंत यशवंत राळेभात श्री. विकास भगवंत राळेभात श्री. दादासाहेब भगवंत राळेभात यांच्या वतीने करण्यात आलेले आहे,शोकाकूल समस्त राळेभात परिवार
जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सन-२०१० विजय गहिनीनाथ चव्हाण रा. सावरगाव ता. जामखेड याने सावरगाव ता. जामखेड येथे एका महिलेचा खुन केलेला आहे. सदर वेळी त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदर गुन्हयाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक स्वर्गीय श्री. ज्ञानेश्वर ढोकले व त्यांचे पथकाने करुन आरोपी याचे विरुद्ध मा. न्यायालयात भरभक्कम पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलेले होते. तद्नंतर सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात होवुन आरोपी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने सन २०१२ मध्ये त्यास मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.…
26 गावामध्ये सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदेंचा पुढाकार जामखेड : लेखाशिर्ष 2515 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी आणल्यानंतर काही तास उलट नाही तोच मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे पुढे सरसावले आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांची अन् जनतेची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी, आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मंत्रिपदाच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण.. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी…
महालोकवाणी न्यूज:- जामखेड प्रतिनिधि:- धनराज पवारआज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे वैशिष्ट्ये दिनांक 28 /1 /2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन कार्यक्रम झाले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याने सांस्कृतिक कार्यक्रम केल्यामुळे पाटोदा गावचे माजी सरपंच तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समीर खान पठाण यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला कारण की लहान लहान विद्यार्थ्यांवर अतिशय दहा ते पंधरा दिवस कष्ट करून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेता आला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यांसमोर करून…
महालोकवाणी न्यूज:-नगर शहर प्रतिनिधी -विजय मते नगर – देव हा भक्ताचा भाव पाहून प्रसन्न होत असतो, पंढरीची वारी करणारा वारकरी अंत:करणापासून विठ्ठलाचे नाम घेत चालतो. एखादी वारी जरी चुकली तरी तो वारकरी अस्वस्थ होत असतो. भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारा पांडूरंग हा भक्तांच्या पाठिमागे आहे. अशा या भक्त आणि भगवंताच नात अतुट असावं, असे प्रतिपादन नगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले.नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीमधील हौशी विठोबा मंदिराचा 26 वा वर्धापनदिन मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची पुजा करुन श्री.गंधे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका संगिता खरमाळे, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका…
डॉ. बाळासाहेब पवारराजकीय व समाजिक क्षेत्रातील अभ्यासक————————————- महालोकवाणी न्यूज:- लावणी व तमशाचा फड , शाहीरी डफ याचा वीर सर व शृंगार सर न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो पण त्याला त्यातील फार समजत अशातला भाग नाही . तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो . तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात , भारुडा त व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेव्हडाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटत लोक संगीत त्याला भावत तर भजन , भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ..लोक संगीत हे त्याला आपले…
राजकीय व समाजिक क्षेत्रातील अभ्यासक महालोकवाणी न्यूज लावणी व तमशाचा फड , शाहीरी डफ याचा वीर सर व शृंगार सर न समजताही अंगात ते जन्मजात भिनलेला बहुजन समाज भजन व भावगीतात रमतो पण त्याला त्यातील फार समजत अशातला भाग नाही . तमाशा त्यातील गण गवळण व वग त्याला आकर्षित करतो . तो तमाशात जसा रमतो तसाच भजनात , भारुडा त व देवीच्या गाण्यात व वाघ्या मुरुळीच्या गाण्यात म्हणजे जागरण गोंधळात पण तेव्हडाच रमतो त्याला ते आपलं जगणं वाटत लोक संगीत त्याला भावत तर भजन , भारूड, देवीची गाणी हा त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ..लोक संगीत हे त्याला आपले वाटते पण…
महालोकवाणी न्यूज:- निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आठ तास झोप आवश्यक असते. मात्र बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या ताणामुळे या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विकसित झालेलं अहमदनगर महानगर देखील त्याला अपवाद नाही. अहमदनगरमध्येही रात्रीच्या वेळी झोप न लागण्याचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ज्ञांकडं याबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये वाढ झालीय. मानसोपचार तज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी यावर काही उपाय सांगितले आहेत. तुम्हालाही या प्रकारची अडचण येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी या टिप्स उपयोगाला येतील. हे ही वाचा:- हिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा ! झोप का लागत नाही याचे कारणे? आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडं अत्याधुनिक साहित्य…