पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज:- दि 1 फेब्रुवारी 2023 शारदा सदन प्राथमिक शाळा बोरीपारधी केडगाव .येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते सुरवातीला दिप प्रज्वलन माजी विद्यार्थी कल्पना पटेल व मोहन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याचे प्रमुख आयोजक . भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे दौंड तालुका उपाध्यक्ष . हेमंतराव नेवसे व .सौ निकिता शहा सौ मयुरी चोपडा सौ कल्पना पटेल यांनी केले होते.या मेळाव्याला एकूण 30 ते 35 विद्यार्थी उपस्थित होते . Budget 2023| Aadhaar-PAN Card बाबत मोठा निर्णय.. या मेळाव्याला सौं मंदान मॅडम.सौ अर्चना उंडे मॅडम. सौ अरुणिमा पाटील मॅडम.सौ आचल आगामकर मॅडम. ईयादी शिक्षक उपस्थित होते.…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज:- दि 1फेब्रुवारी 23 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केला. यामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाचव्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून स्वीकारले आहे. यासोबतच आधार कार्ड आणि डिजी लॉकरवरही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. हिंदू जन आक्रोश कशासाठी ? अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सर्व डिजिटल सिस्टमसाठी पॅनकार्ड आयडेंटिफाय केले जातील. यासोबतच युनिफाइड फाइलिंग प्रोसेस सेटअपही केला जाईल. त्याचा वन स्टॉप सोल्यूशन, ओळख आणि पत्त्यासाठी वापर केला जाईल. कॉमन पोर्टलद्वारे एकाच ठिकाणी डेटा असेल. त्याच्या मदतीने…
डॉ . बाळासाहेब पवार :- राजकीय अभ्यासक महालोकवाणी न्यूज:- भारतात सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे . सर्व सत्ता स्थाने, नोकरशाही , पोलीस दल ,सैन्यदल यात 90% पेक्षा जास्त संख्या हिंदूंची आहे . तरी या देशातील हिंदू चा जनाक्रोश कशासाठी हा प्रश्न भारतात नव्हे तर जगातील ज्या देशात ही बातमी पोहचते त्या देशातील जनतेला सुद्धा पडला असेल . आतां जगात कोठे काहीही घडो ते देशापुरते मर्यादित राहत नाही . सोशल मीडिया .इलेक्ट्रॉनिक मीडिया तुन जगभर पोहचले जाते. भारतात गेली आठ वर्ष नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे . व जगातील सर्व हिंदूंची संघटना आहे असा दावा करणारी व आंतरराष्ट्रीय संघटन असणारी राष्ट्रीय…
पुणे : दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांना जामिन मंजूर करण्यात आला असून यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. मात्र अजून एक गुन्हा त्यांच्यावर दाखल असून त्यामध्ये ते सह आरोपी असल्याने जो पर्यंत त्यामध्ये त्यांचा जामिन होत नाही तोपर्यंत त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच होणार आहे. बोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर फिर्यादीकडून भादवी कलम 307,354,325,आर्मॲक्ट आणि ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बादशहा शेख यांनी त्यांचे वकील ॲड. समीर शेख आणि ॲड.अझहरुद्दीन मुलाणी यांच्यामार्फत बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अगोदर अटकपूर्ण जामिन अर्ज केला होता. तो फेटाळला गेल्यानंतर बादशहा…
अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजवर बहिष्कारचा निर्णय घेऊन राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद.. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशाराही कृती समितीने दिला असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वैभव रोडी व सचिव…
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतरच पंतची खरी रिकव्हरी सुरू होणार आहे. अखेर भारताने सामना जिंकला; मात्र न्यूझीलंडची ९९ धावा असूनही शेवटच्या चेंडूपर्यत झुंज ! 30 डिसेंबर रोजी पंत याचा कार अपघात झाला होता. यानंतर त्याला काही दिवस डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले, जेथे पंतच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली. इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पंत असेच बरे राहिल्यास त्याला या आठवड्यातच डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे…
महालोकवाणी न्यूज:-ता. 31 जाने 23 आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार रुईछत्तिशी तालुका नगर येथे परवाना धारक डॉक्टरच्या नावाखाली चाललेल्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश रुईछत्तिशी तालुका नगर येथे डॉ.डी.बी.बोस नामक व्यक्तीच्या नावाखाली उपचार करत असलेल्या ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला,रुईछत्तिशी गावातील शंकर फुलमाळी यांची कन्या पूजा हिचा या दवाखान्यात प्रस्तुतीदरम्यान (डिलिव्हरी) दरम्यान मृत्यू झाला,या सर्व प्रकारातून रुईछत्तिशी येथे बोगस डॉक्टर उपचार करत आहे असे नगर तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले,यावर तात्काळ आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे,तालुका पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी लगेच कारवाई करण्याचे निर्देश दिले,दवाखान्यात असणाऱ्या औषधांची जप्ती करण्यात आली आहे,डॉ.डी.बी.बोस यांच्या नावाखाली रुईछत्तिशी येथे गेल्या अनेक वर्षापासून बोगस उपचार…
महालोकवाणी न्यूज :- 31 जानेवारी 2023 – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नागपूर जिल्हातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लीलावामध्ये काढल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थीती ही हालाकिची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर ! यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फार कमी आहे. दुसरीकडे नागपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अदयापही…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज:- ता. 31 जाने 23 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण व शहर आयोजित अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 30 रोजी सकाळी 10-30 वाजता पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अपंगांच्या आयोजित मेळावे – पाठपुराव्याने दिव्यांग बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य मिळण्यासाठी दोन वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात शिबिरे घेण्यात आली होती. त्या योजनेतील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यास केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. आंदोलनासाठी ग्रामीण व शहरातील विविध अपंग जिल्हाध्यक्ष, अपंग तालुकाध्यक्ष,महिलाध्यक्ष, अपंग बांधव, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी…
मुंबई : संपूर्ण राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदान येथे लिंगायत समाज एकत्र आला आहे. राज्य सरकारच्या विरोधात लिंगायत समाजाने आज महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मुख्य मागण्यांसह इतर आपल्या काही मागण्या घेऊन या आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य ! ▶ राज्यभर 22 वेळा मोर्चे काढले आधीही याच मागण्यांसाठी लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे काढण्यात आले होते. मात्र एवढ्या वेळा मोर्चे काढूनही सरकार आपल्याकेड दुर्लक्ष करत असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर आझाद…