महालोकवाणी न्यूज:- उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. आज दिनांक २३/१/२०२३ दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढं जाऊ. शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण, प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. दोघांच्या संयुक्त निवेदनात:- आपल्या देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडं जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं…
Author: mahalokwani
संपादक:- सचिन कांबळे -9604737188 महालोकवाणी न्यूज:- बोल्हेगाव मधील द्वारका नगरी ही वसाहत नव्याने तयार झालेलि आहे. या द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेलि नव्हती . येथील सर्व महिला दुर अंतरावरून पिण्याचे पाणि आणत होत्या. यामुळे येथील सर्व नागरीक अत्यंत त्रस्त झालेले होते. त्यांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या बाबत द्वारका नगरी मधील सर्व नागरीकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले ,पिण्याच्या पाण्याची महत्वाची समस्या असल्याने पाणीपुरवठा विभाग मनपा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून,नागरीकांच्या सहकार्यातुन द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन द्वारका नगरी मधील नागरीकांची कायमची समस्या सोडवलि.…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- महालोकवाणी न्यूज:- दौंड तालुक्यातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत गेल्या पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अद्याप या चार मृतदेहाची ओळख पटलेली नाही, तसेच या भागात वाळूचे अनेक अड्डे आहेत, याबाबत ही यवत पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे या परिसरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहे मध्यम वयीन महिला आणि पुरुषांचे मृतदेह असून नेमका घातपात झाला आहे की आत्महत्या केली याबाबत खात्री पटली नाही, या परिसरात हे मृतदेह एकाच कुटुंबातील आहेत की वेगवेगळ्या कुटुंबातील आहे…
महालोकवाणी न्यूज:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकत्याच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आले आहेत, अहमदनगर जिल्ह्याच्या प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट पदी मा नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे पाहायला मिळत आहे . दिनकर यांचे काम अतिशय उत्कृष्ट असून एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून पक्ष संघटना मजबूती करणांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, तसेच विविध आंदोलने यांच्यामार्फत दिनकर यांनी स्वतःचे काम सिद्ध केले आहे , तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय विश्वासू म्हणून नितीन दिनकर यांची ओळख आहे, याच निमित्ताने आज अहमदनगर येथे त्यांची निवड…
महा लोकवाणी न्यूज मुंबई दि. 20 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एक दिवसीय अभ्यास शिबीर येत्या मंगळवार दि.24 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथील ब्ल्यू पार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत करण्यासाठी ; रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या पक्ष संघटन व्यापक करण्यासाठी या अभ्यास शिबिरात विचारमंथन करण्यात येणार आहे. रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिरात दलित आदिवासी अल्पसंख्यांक मागासवर्गीय सर्व समाज घटकांच्या विषयावर चर्चा होणार आहे. रिपाइं च्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात डॉ.शरण कुमार लिंबाळे ; डॉ.अच्युत…
महालोकवाणी न्यूज:- दि. 22 जाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले:- दरम्यान शिवसेना-वंचित यांची युती कधी होणार? याबाबत प्रकाश आंबेडकर यांनाही विचारण्यात आलं. शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या…
महालोकवाणी न्यूज (प्रतिनिधी )- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सर्पमैत्रीण राजश्री निलेश अमोलीक हिने साडे चार फुट काळ्या रंगाचा अति विषारी नाग पकडून त्यास पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असुन भल्या भल्यांना धडकी भरविणाऱ्या नागास एका महीलेने पकडलेले पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतीत चक्कर मरण्यासाठी गेले असता शेतीची देखभाल करणाऱ्या आनंदा बर्डे याच्या समोरच अचानक एक काळ्या रंगाचा नाग गेला . त्यानंतर तो नाग जवळील शेडमध्ये असलेल्या जुन्या पाईपच्या ढिगात घुसला पत्रकार देसाई यांनी तातडीने बेलापुर येथील सर्प मित्र जयेश अमोलीक यांचेशी संपर्क साधला अवघ्या काही वेळातच जयेश आमोलीक व राजश्री…
नवी दिल्ली : २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला आहे. ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा.. सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलीनबाबत मला भडकवायची आणि माझं…
देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसीमध्ये मोठी भरती निघाली आहे. अप्रेंटिस डेवलपमेंट ऑफिसरची सव्वा नऊ हजार पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज कसा करावा, अखेरची तारीख आदी माहिती देण्यात आली आहे. महत्वाची तारीखऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 21 जानेवारी 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून भरती अधिसूचना पहावी. वय मर्यादासर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. अर्ज शुल्कया पदांसाठी…
IND vs NZ : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये आज न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्सने न्यूझीलंडवर मोठा विजय (team india beat new zealand) मिळवला आहे. नुकतंच टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली होती. 317 रन्सनी सामना जिंकत भारताने इतिहास रचला होता. तर आता अवघ्या 5 दिवसांत दुसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने जिंकली सीरिज न्यूझीलंडविरूद्धचा दुसरा वनडे टीम इंडियाने 8 विकेट्सने जिंकला. या सामन्यासह भारताने सीरिज देखील खिशात घातली आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. कर्णधाराने ओपनिंगला उतरत अर्धशतक झळकावलं आणि टीमला…