धनराज पवार कर्जत | कर्जत जामखेड मतदारसंघ हा आवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे. अशातच जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षाही पाऊस कमी झाल्याने कर्जत-जामखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळी विजेचा लपंडाव होत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसा १० ते १२ तास वीज उपलब्ध करा त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्जत जामखेड तालुक्यातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना स्वतंत्रपणे निवेदनाद्वारे विजेचा नियमित पुरवठा व पूर्ण दाबाने वीज मिळावी यासाठी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विनंती केली आणि उचित निर्णय नाही झाला तर आंदोलनाचा इशारा देखील दिला…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी सध्या जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत खरीप पिके जळुन चालली आहेत. उर्वरित पिकांसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेतीपंप विज पुरवठा विस्कळीत शेतकरी आक्रमक भुतवडा, जगदाळे वस्ति व जमादारवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.आज रोजी महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, अशोक राळेभात, ऋषिकेश कदम,ज्ञानेश्वर कदम, वाल्मिक जगदाळे, पांडुरंग कदम, रमेश नेटके, पवन आजबे, ज्ञानदेव कोल्हे, शुभम आजबे, दिपक जगदाळे, अशोक नेटके,…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरामध्ये नव्यानेच सुरू झालेले गरीब हेअर सलुन या दालनाचे मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी खर्डा रोड येथे सोमनी टाॅवर कॉम्प्लेक्स येथे जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील व वसिम भाई बिल्डर कुरेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा मधुकर राळेभात,हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान, उमरभाई कुरेशी, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण (मामा) धनवडे,मोहन पवार,जमीर सय्यद,माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, शाकीर खान, नगरसेवक शामीरभाई सय्यद, राजेश वाव्हळ, अर्शद शेख,पवन राळेभात, संदीप गायकवाड,गणेश डोंगरे, माजी सरपंच समीरभाई पठाण, गफ्फारभाई पठाण, प्राचार्य विकी घायतडक सर, युवा नेते काकासाहेब गर्जे,सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले,अनिल पवार,अर्जुन म्हेत्रे,सनि सदाफुले…
ऑगस्ट महिना संपत आला आहे. सप्टेंबर September Rules महिन्यात अनेक महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांची माहिती प्रत्येकासाठी महत्त्वाची असते. सप्टेंबर महिन्यात जात असल्याने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा अडचणी वाढू शकतात. त्यातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत उरलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेणे. आरबीआयच्या घोषणेनुसार, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंतच बदलता येतील. असे न करणाऱ्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या महत्त्वाच्या बदलांबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम, सिलिंडरच्या कमी झालेल्या किमतीपासून सुरुवात. September Rules सप्टेंबरपासून या नियमात बदल Asia Cup Ind Vs Pak : भारत पाकिस्तान सामना या दिवशी होणार ;…
कर्जत/ जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये यंदाच्या वर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत याशिवाय पशुधनही पाणी व चाऱ्याअभावी ग्रस्त आहे. चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करण्याचीही आ. रोहित पवार यांची मंत्र्यांना विनंती हे पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्यांची अतिशय गरज आहे तसेच पशुधन आणि नागरिकांनाही पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याचे टँकरही चालू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषि विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे. सध्याच्या दुष्काळग्रस्त…
आशिया कपसाठी Asia Cup टीम इंडियाचा सराव आता जवळपास पूर्ण झाला आहे. म्हणजे आता प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. आशियाचा राजा होण्याच्या लढाईत बाजी मारणे. सर्व तयारी करूनही हे करण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समतोल असणे आवश्यक आहे. आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. हा सामना कँडी येथे होणार आहे. Asia Cup Ind vs Pak पाकिस्तानचा संघ अजूनही फॉर्मात आहे आणि, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या खेळाडूंना श्रीलंकेच्या परिस्थितीचा आणि हवामानाचा ताजा अनुभव आहे. आशिया चषकापूर्वी, अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकून ते नंबर वन वनडे संघ बनले. पण, याचा अर्थ असा नाही की त्यांचा पराभव होऊ शकत नाही. कर्णधार रोहित…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे, जामखेड महाविद्यालय, जामखेड IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिसंवाद कार्यक्रम दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सम्पन्न झाला, या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उद्धव (बापू) देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक मा.महेश पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जामखेड) हे होते.या प्रसंगी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम. एल., संस्थेचे संचालक मा. सैफुल्ला खान साहेब, कला शाखा प्रमुख मा.प्रा.ए.बी.फलके,IQAC समन्वयक प्रा.गाडेकर एस.एन.वूमेन एम्पावरमेन्ट प्रमुख प्रा.डॉ.श्रीमती साबळे वाय.एस., प्रा.डॉ.देशपांडे आर.के व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मा. प्राचार्य डॉ. डोंगरे साहेब यांनी केले.…
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार व अन्याय होण्याचे प्रमाण वाढत असताना दिसत आहे यातच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे नुकतीच एक घटना घडली असून यामध्ये अतिशय शुल्लक कारणावरून एका दलित कुटुंबातील मुलाला झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आहे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत हे सर्व अन्याय व अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत व या अन्याय करणाऱ्या नराधमांना कडक शासन झाले पाहिजे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर हे उद्या ३० ऑगस्ट रोजी हरेगाव येथे येऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत अशी माहिती…
धनराज पवार: जामखेड प्रतिनिधी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त,मोरे वस्ती श्रीकृष्ण नगर जामखेड येथे संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे जामखेड शहरात एकमेव असलेले श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी गुरुवार दिनांक 31-8 -2023 ते बुधवार 6 -9- 2023 या कालावधीत सायंकाळी ६ ते ९या वेळेत संगीत भागवत कथा चे आयोजन करण्यात आलेले आहे [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] संगीत भागवत कथाकार ह भ प दयाल चैतन्य प्रभू यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे तरी भाविक भक्तांनी संगीत भागवत कथेचा लाभ घ्यावा बुधवार दिनांक 6 -9- 2023 दुपारी ४ते६या वेळेत महिला मंडळाचे भजन होईल तसेच ९ ते १२ श्रीकृष्ण कथा अभिषेक व श्रीकृष्ण…
चांद्रयान-3 च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) एक नवीन पाऊल टाकणार आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल1 ADITYA-L1 अंतराळयान प्रक्षेपित होणार असल्याची माहिती इस्रोने सोमवारी दिली. आदित्य एल1 ADITYA-L1 अंतराळयान हे मिशन PSLV-C57 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल, ज्याचा उद्देश सूर्याच्या रहस्यांचा अभ्यास करणे आहे. तसेच क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंग, अंशतः आयनीकृत प्लाझमाचे भौतिकशास्त्र आणि कोरोनल मास इजेक्शन आणि फ्लेअर्सची सुरुवात. त्याच वेळी, आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अवकाश-आधारित वेधशाळा असेल. हे अंतराळयान सूर्यापासून निघणाऱ्या कणांच्या गतिशीलतेवरील डेटा संकलित करण्यासाठी इन-सीटू कण आणि प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करेल. यामुळे सौर…