९ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शिवाजीराव सातव यांच्या महाराष्ट्र विकास केंद्र गेल्या ९ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत असून संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.अशा या संस्थेच्या माध्यमातून सातव यांचे कार्य कौतुकास्पद आहे,असे मत गटशिक्षणअधिकारी बाळासाहेब ठाकरे धनवे यांनी व्यक्त केले. जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य संचलित, महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्र डोणगाव यांच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना उल्लेखनीय कार्य बद्दल पुरस्कार तसेच होमगार्ड सैनिक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Author: mahalokwani
नगरमध्ये मारहाणीत एकाचा मृत्यू नगर शहरात एकामागे एक खुनाच्या घटना घडतात केडगाव येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत मृत्यू झालेल्या 35 वर्षे तरुण विशाल नागनाथ धेंडे या तरुणाच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे या घटनेवरून सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या असून त्याचे तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटत आहेत. या अगोदर दोन-तीन दिवस तो घरी राहिला होता कारण यापूर्वी त्याला मारहाण करण्यात आली होती तो पुन्हा काल दि. ५ऑगस्ट रोजी सकाळी रेल्वे स्टेशन येथे गेला असता त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली त्यामध्ये विशाल धेंडे याचा मृत्यू झालेला आहे असे नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप…
जामखेड तालुका अध्यक्ष पदी नय्युमभाई सुभेदार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आमदार बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. जामखेड शहरातील लोकमान्य वाचनालय येथे पदाधिकारी निवड सभा 5 ऑगस्ट रोजी पार पडली .अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विस्तारीत तालुका कार्यकारीणी जाहीर केली. आमदार बच्चु कडु व प्रवक्ते संतोष पवार यांच्या सुचनेनुसार जाहीर झालेल्या या जामखेड तालुका कार्यकारीणीत तालुका अध्यक्ष या पदावर नय्युमभाई सुभेदार यांनी काम करून पक्ष विस्ताराची तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारीणीत…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ,महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा उपक्रम नियोजित दि.३० जुलै २०२३, रविवारी रोजी सकाळी १०.१५ वा.ओम दत्त सन्यासी आश्रम,अहमदनगर येथील मंदिरात कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन सौ.अनघा श्रीकांत नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्यांनी मंदिरात प्रसाद म्हणून स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिनकर टेमकर साहेब हे होते. याच कार्यक्रमात श्री .दिनकर टेमकर साहेब ( माजी शिक्षण संचालक ) यांच्या हस्ते पर्यावरण मडंळाचे राज्य अध्यक्ष श्री . प्रमोद मोरे ( दादा ) यांनी जिल्हा संघटक पदाचे नियुक्ती पत्र श्रीम . कामिनी राजगुरु…
VIP Number मिळतात शुल्लक किमतीत तुम्हालाही तुमच्या वाहनासाठी स्पेशल नंबर मिळवायचा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. काही लोक स्पेशल नंबरला VIP Number नंबर म्हणतात, तर काही लोक त्याला फॅन्सी नंबर म्हणतात. काही लोक त्यांच्या वाहनांवर इतके प्रेम करतात की त्यांना त्यांच्या गाडीसाठी असे नंबर शोधतात, जे त्यांना आवडतात किंवा त्यांच्यासाठी लकी असतात. आपले वाहन वेगळे आणि हटके दिसावे, यासाठी लोक हजारो-लाखो रुपये खर्च करतात. VIP क्रमांक 007, 00005, 786 आणि 0001 सारख्या अनेक क्रमांकांचा समावेश आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या कार किंवा बाइकसाठी व्हीआयपी नंबर कसा मिळवू शकता. अशाप्रकारे बुक करा ऑनलाइन फॅन्सी नंबर प्रथम कार…
धनराज पवार जामखेड तालुका हा उडीद पिकामध्ये खूप मोठी लागवड असणारा तालुका आहे,दरवर्षी ची परंपरा कायम ठेवत या वर्षी सुद्धा खूप शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची लागवड केले ली आहे. मागील दहा दिवसांत काहीतरी रोगाला उडीद पीक बळी पडत असून बहुसंख्य शेतकऱ्यांची उडीद पिके ही जळून गेली आहेत किंवा जळण्याचा मार्गावर आहेत. या बाबीकडे कोणाचेही लक्ष नसून आपण प्रशासनाला योग्य सूचना देऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत पोहोच करून जे काही पिके राहिली आहेत त्यांना कसे वाचवता येईल याविषयी मार्गदर्शन व्हावे आणि जळालेल्या उडीद पिकांचे पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हा हंगाम शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये च निसर्गाने…
बबनराव धायतोंडे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.4 रोजी निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे. यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे . यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे…
धनराज पवार Nagpanchimi| जामखेड येथे नागपंचमी गुंडांना हद्दपार केले जाणार.. जामखेड शहराचे दैवत श्री . नागेश्वरच्या यात्रेनिमीत्त जामखेड येथे मोठी जत्रा भरवण्यात येत असते , ऑगस्ट महिन्यात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते , पंचोक्रोशीतील नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात, संपूर्ण महाराष्ट्रातून हि नागपंचमी Nagpanchimi पाहण्यासाठी येत असतात , त्यामुळे जामखेड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, सध्याचे नगर जिल्ह्याचे वातावरण बघता जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, जामखेड मध्ये सुद्धा गुन्हेगारी डोके वर काढत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे याच धर्तीवर जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ शशांक वाघमारे,महावितरण प्रशासनाचे…
Sambhaji Bhide संभाजी भिंडेंच तोंड आवरेना.? शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. संभाजी भिडे यांच्यावर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटले. परत एकदा संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी संपूर्ण देशाचे दैवत समजले जाणाऱ्या आणि अहमदनगर जिल्ह्याची ओळख ज्या शिर्डी येथील साई बाबा मुळे आहे, त्यांच्यावर बोलतानाही भिडे याची जीभ घसरली पाहायला मिळत आहे, यावेळी त्यांनी असे म्हटले की, आपला हिंदू समाज ज्या…
Nitin Desai एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या सुप्रसिद्घ कला दिग्दर्शक नितीन देसाई Nitin Desai यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी देसाई यांनी एका व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आपलं मनोगत मांडलं होतं. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, याचा तपशील समोर येत आहे. नितीन देसाई यांचे 11 ऑडिओ क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सर्वप्रथम लालबागचा राजाला अखेरचा नमस्कार असं म्हटलं आहे. दरवर्षी ते लालबागचा राजासाठी सुंदर देखावा निर्माण करायचे. यावर्षीही त्यांनी मंडपाचं काम हाती घेतलं होतं. त्याचे काही फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपनीला देऊ नका, अशी…