अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पिकअपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडले असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे इथं जात असणाऱ्या शेतमजुरांना हा अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी इथं हा अपघात झाला आहे. अपघातातील सर्व शेतमजूर आहेत. सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. हे सर्व शेतमजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे…
Author: mahalokwani
पुणेः भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे सकाळपासून हरवलेले वडील महादेव जाधव अखेर मुंढवा पोलीस स्टेशन जवळ सापडले आहेत. पुण्यातील कोथरूड भागातून क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता झाले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. दिवसभर शहर पोलिस दलातील पाच पथकाकडून तपास घेण्यात येत होता. केदार जाधव यांचे कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव हे सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले, मात्र रात्रीपर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नव्हता. त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोनही बंद लागत होता. त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.अखेर केदारचे वडील महादेव जाधव मुंढवा…
IPL Rules 2023 : IPL 2023 च्या 16 व्या सीजनला आता आठवड्याभराचा अवधी उरला आहे. दरवर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह असतो. या सीजनमध्ये ‘होम-अवे’ फॉर्मेट असणार आहे. म्हणजे यंदा सर्वच टीम आपलं होम ग्राऊंड आणि दुसऱ्या टीम्सच्या मैदानावर खेळणार आहेत. कोरोनाव्हायरसमुळे मागची तीन वर्ष ठराविक ग्राऊंडसवरच सामने झाले. यंदाच्या आयपीएलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियम. यंदाच्या आयपीएलमध्ये तुम्हाला नवीन नियम दिसतील. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. तेव्हापासून हे नियम लागू होतील. आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी गुजरातचा कॅप्टन हार्दिक…
ITR Form-16 : तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्ही ऐकलं असेल की कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या पगारातून TDS कापला जातो. हा तुमचा TAX रेकॉर्ड आहे. मागील आर्थिक वर्षासाठी कंपनीकडून दरवर्षी मे अखेरीस फॉर्म-16 जारी केला जातो. जो १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी असतो. फॉर्म 16 हे मूलत: एक प्रमाणपत्र आहे जे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना जारी करतं. हे प्रमाणपत्र तुमच्या पगारातून टीडीएस कापून कर्मचाऱ्याच्या वतीने सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केल्याची मान्यता देतं. प्रत्येक कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप देणं आवश्यक आहे. फॉर्म 16 मध्ये प्रत्येक महत्त्वाचा तपशील आहे जो आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त आहे. याद्वारे तुम्ही टीडीएस म्हणून…
पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज (ता.२७)रोजी दुपारी १वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ता.पाटोदा,जि. बीड येथून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे संयुक्त विद्यमाने हेलिकॉफ्टर मधून चिंचपूर पांगुळ येथे आयोजित सप्ताहासाठी आणल्या आहेत. या प्रसंगी शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन ,तसेचभगव्या पताका घेऊन पुरुष लहान मुले सहभागी झाले होते.गावातून बँड, टाळ,मृदुगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी एक वाजता हेलिकॉपटर ने मंडपावर…
नगर – प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत आता अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार वाढत आहे. विविध देव-देवतांची मंदिरे, अखंड हरिनाम सप्ताह, नित्यनियमाने होणारे धार्मिक कार्यक्रमांमुळे नागरिक एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता, प्रेम टिकते अशा अध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास होणे अपेक्षित आहे. सावेडी उपनगरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने मनपा सभागृह नेतेपदी विनित पाउलबुधे यांची तर स्थायी समिती समिती सदस्यपदी निवड झालेले सुनिल त्र्यंबके यांचा तसेच वेळोवेळी मंदिर उभारणीसाठी, प्रवेशद्वाराकरीता सहकार्य करणारे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांचा व माजी जि.प.सदस्य बाळासाहेब सोनवणे यांची जिल्हा फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, बाबासाहेब मरकड, गिरिश धर्माधिकारी, संतोष उपाध्ये,…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी : – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आज सकाळी ठीक १२:०० वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे वतीने हेलिकॉफ्टर ने आणल्या जाणार आहेत. गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात येईल व त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत. चिंचपूर पांगुळ-माणेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड…
जगातली अनेक ठिकाणं वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, काही ऐतिहासिक महत्त्वामुळे ओळखली जातात, तर काही ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता इतकी असते की आपली नजर तिथून हटत नाही. नेदरलँड्समध्ये असं एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीत. होय. तुम्ही बरोबर वाचत आहात, तिथे रस्ते नसलेलं गाव आहे आणि ते गाव खूपच सुंदर आहे. या गावात कार, बाइक यासारखी वाहनंही नाहीत. या गावात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. नदीकाठी असलेलं हे गाव सर्वात लहान गाव आहे. इथलं प्रदूषणमुक्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून लोक भेटी देतात. या गावातली टुमदार घरं आणि नदीतलं स्वच्छ पाणी पाहून मन प्रसन्न…
मुंबई : गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने सुटकेचा श्वास सोडणाऱ्या राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर आज राज्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ✦ सक्रिय रुग्णसंख्या वाढली राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1956 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,795 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. ✦ पुणेकरांची चिंता वाढलीशनिवारी राज्यात 437 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 242 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.…
आमदार रोहित पवार यांची शालेय विद्यार्थ्यांना अनोखी भेट; मतदारसंघातील विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुखकर जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्जत / जामखेड | आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये या बाबीकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील तब्बल १० हजार ५ वी ते १० वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती ऍग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार…