Crop Insurance : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन स्तरावर भरीव मदत देण्याचे आश्वासन देत दिवाळीपूर्वी रक्कम (Crop Insurance) देण्याची घोषणाही केली होती. मात्र सरकारची घोषणा हवेत विरणार असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे दिसते.
Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट…
Table of Contents
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान (Crop Insurance)
यंदा सुरुवातीला पाऊस उशिरा झाला. त्यानंतर काही दिवस अतिवृष्टी झाली. दरम्यानच्या काळात पावसाचा खंडही पडला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे निम्म्यापेक्षाही कमी उत्पादन (Crop Insurance) झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापण्याऐवजी संपूर्ण शेतातच रोटावेटर फिरवले.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे नुकसान लक्षात घेता पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नागपुरात आले असता केली होती.
दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप पीक विम्याची अग्रीम रक्कम (Crop Insurance) मिळाली नाही. विशेष म्हणजे विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
६३ हजार शेतकऱ्यांनी काढला विमा (Crop Insurance)
यंदा प्रथमच १ रुपयात विमा काढम्यात आला. नागपूर जिल्ह्यातील ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. लाभासंदर्भात विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही
Crop insurance supports the American farmer, the American economy, and the American family. That’s why more than 90% of insurable #Farmland in the U.S. is now protected through the Federal #CropInsurance program: https://t.co/3rWI71jpbk pic.twitter.com/SF2RdzzmzP
— NCIS (@UScropinsurance) November 8, 2023
ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप
एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी दोन लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा (Crop Insurance) काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.
ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल,
नागपूर जिल्ह्यातील ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. लाभासंदर्भात विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.
एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीकडून काही आक्षेप घेण्यात आले होते. त्या आक्षेपाची पूर्तता जिल्हास्तरीय संयुक्त समितीमार्फत लगेच करण्यात आली. त्या अनुषंगाने सद्यस्थितीमध्ये पिक विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडळांतील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध कृषी योजनांची अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दोन लक्ष ११ हजार ९६८ शेतकऱ्यांनी दोन लक्ष १६ हजार २३२ हे. क्षेत्रावर पीक विमा (Crop Insurance) काढलेला असून जवळपास ९५ टक्के सोयाबीन क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे.