Eknath Shinde : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ग प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यातील अनेक जिल्हे, तालुके बंद करत निषेध व्यक्त केला जात आहे तसेच एस टी बसेस सुद्धा बंद केल्या आहेत. अशातच आता राज्यात एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक होतायेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात व्यस्त होते.. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही गैरहजर होते. याच पार्शवभूमीवर एकनाथ शिंदेच्या माथी मराठा आंदोलन प्रकरणाचं खापर फुटणार अश्या चर्चाना उधाण आलाय.. चला तर जाणून घेऊ थोडं सविस्तर..
फडणवीसांचे आदेश, Eknath Shinde यांना भोगावे लागणार
मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जालन्यातील आंदोलनकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. सरकारचा त्यांच्याशी संवाद सुरू होता आणि त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यावर चर्चा सुद्धा सुरू होती. मराठा आरक्षणावर सरकार काम करत असून आणि हा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही.
तसेच जालन्यातील घटना ही खरोखर दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. लाठीचार्जमध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशी प्रकारची काळजी घेण्यात आली होती. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

अजित पवारांमुळं Ekanth Shinde असुरक्षित
अजित पवार सरकारमध्ये आल्याने शिवसेनेच्या आमदारांची घालमेल होत असल्याचे दिसून आले, दरम्यान शिवसेनेत बंड होत असताना अजित पवार यांचंच कारण पुढे करत शिवसेनेच्या आमदारांनी टीका केली होती. मविआ सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही असा आरोप सातत्याने शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळं त्यांना परत अजित पवार यांच्यासोबतच काम करावं लागत आहे. तसेच राजकीय वर्तुळात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चामुळे सुद्धा Eknath Shinde आता असुरक्षित झाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा बॅकअप प्लॅन अजित पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांचं सुप्रीम कोर्टाकडून निलंबन झालं तर महायुतीचे सरकार अल्पमतात येईल, परिणामी राज्य सरकार कोसळेल. मात्र अजित पवार सरकार मध्ये आले होते तेव्हा पत्रकारांनी १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते. सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; 288 आमदारांपैकी जर समजा 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. तरी सरकारच्या बहुमतावर काहीच परिणाम होत नाही. कारण 16 आमदार अपात्र झाले तर आमदारांची संख्या 272 होईल. आणि बहुमताला जी संख्या हवी आहे, तो आकडा सत्ताधारी मंडळीकडे असल्याचे अजित पवार म्हणाले. Eknath Shinde जरी सत्तेतून गेले तरी अजित पवार सरकारमध्ये राहतील याच छुप्या उद्देशाने फडणवीसांनी अजित पवारांना सरकारमध्ये सोबत घेतलं.
हे ही वाचा 👉: जालना मराठा आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार; राज्य सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई..
जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे राज्यात अशांतता निर्माण झाली आहे, हे उपोषण शांततेच्या मार्गानी चालू होते, असे अचानकपणे काय घडले? एवढा पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी पाठवण्यात आला? फायरिंग आदेश कोणी दिले? याची सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा खरा मास्टर माईंड उघड होईल, यामध्ये पोलीस अधीक्षकचा बळी देऊन चालणार नाही, कारण त्यांना हा आदेश कोणी दिला हे पण जनतेसमोर आले पाहिजे.
