जालन्यात मराठा Maratha आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आज तिसऱ्या दिवशीही निदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रास्तारोकोही केला जात असून काही भागात बंद पुकारण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविला जात आहे.
Maratha बेछूट लाठीमार प्रकरण सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई

जालन्यात मराठा Maratha आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जात आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. आज तीन दिवस झाले तरी राज्यात मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी सरकारने काहीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज तीन दिवसानंतर सरकारने मोठी कारवाई केली आहे.

Table of Contents
जालन्यातील आंतरवाली सराटे या ठिकाणी अनेक नेत्यांनी Maratha उपोषण कर्ते यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आहे, व या सरकारवर टीका केली आहे, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, कोणाच्या आदेशावरून हा लाठीचार्ज करण्यात आला, हे जनतेमसोर आले पाहिजे, व दोषींवर कठोर शासन करण्यात यावे असे सांगण्यात येत होते, तसेच सामान्य जनेतला त्रास होणार नाही याची हि आंदोलनकर्त्यांनि दाखल घ्यावी , आंदोलन शांततेच्या मार्गांनी चालू ठेवा असे आव्हान करण्यात येत आहे.
जालन्यात झालेल्या लाठीमार प्रकरणी गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरवाली सराटे येथील लाठीमारप्रकरणी गृह मंत्रालयाने तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तुषार दोषी यांच्या आदेशामुळेच हा लाठीमार करण्यात आला. आंदोलन शांततेत सुरू होतं. पण अचानक आदेश आला आणि लाठीमार करण्यात आला, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
तीन दिवसानंतर कारवाई का? दरम्यान, राज्य सरकारने तीन दिवसानंतर पोलीस अधीक्षकावर कारवाई केल्याने मराठा समाजातून त्याचं स्वागत होत आहे. पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतरही कारवाई करण्यासाठी तीन दिवस का लागले? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. तसेच अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचे काय? असा सवाल करतानाच आमच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
