जालन्यात Jalana मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे.
मराठा समाज जर तुम्हाला सत्तेत आणु शकतो तर तुम्हाला सत्तेतून बाहेर काढु शकतो.
जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
याबाबत माहिती अशी की,29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाम झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
प्रतिक्रिया: मा. पै.दादासाहेब (हवा) सरनोबत मनसे नेते
“आमच्या आंदोलन कर्त्या आई ,बहीण वर असा अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहिर निषेध , राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त झाला आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही.”मराठा समाज जर तुम्हाला सत्तेत आणु शकतो तर तुम्हाला सत्तेतून बाहेर काढु शकतो. मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
