जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, एस. टी. महामंडळाच्या बसेसची अवस्था दयनीय आहे परंतु आता या बसवर असणाऱ्या नावाच्या पाट्या करायला पण या सरकारडे पैसे शिल्लक राहिले नाहीत , एकीकडे शासन आपल्या दारी या कार्यकर्मासाठी कोटीच्या – कोटी खर्च केला जात आहे , पण बसवरती शहराचे नावे लिहण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.
jamkhed Bus Depo प्रवाशांची मोठी कोंडी.!
अशीच घटना जामखेड तालुकयातील बस आगारात पाहायला मिळाली आहे, या बस स्टँड Jamkhed Bus Depo अनेक लोकांची वर्दळ असते, पण या बस स्टॅन्डचे नवीन बांधकाम चालू आहे , त्यामुळे प्रवांशाचे प्रचंड हाल होत आहे, त्यातच जामखेड आगारातील अनेक बसेसवर नावाच्या पाट्याच गायब झाल्या आहेत , आणि विशेष म्हणजे यावर नाव लिहण्यासाठी चक्क खडूचा वापर केलेला पाहायला मिळत आहे.

पण बस वरती खडूने लिहलेल्या नाव पुसून जाते, व ते अस्पष्ट दिसते, त्यामुळे प्रवाशांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे, मात्र याकडे जामखेड बस आगाराचे Jamkhed Bus Depo प्रमुख यांचे दुर्लक्ष झालेले आहे का त्याना दिसून सुद्धा न दिसल्याचे सोंग तर करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित हात आहे , प्रवाश्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे, प्रवाशांची यामध्ये हेळसांड होत आहे, यामध्ये प्रचंड इकडे तिकडे पळा – पळ होत आहे तरी याकडे सरकारने लक्ष द्यावे ,
हे नक्की वाचा ST Employee DA । लालपरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवला, किती पगार वाढणार?
जामखेड आगाराच्या Jamkhed Bus Depo कुठल्याही बस वर बघाल तर एकाही गाडीवर कसलेही फलक नसून सर्व प्रवासी गोंधळात नुसती पळापळ करताना दिसतात पाऊस चालू आहे तसेच लोकांना निवारा नाही.व गाड्यांचे व्यवस्थित नियोजन.. लहान मुलं महिला व वृद्धांचे अतोनात हाल बस स्थानकावर पाहायला मिळते .अशातच आगार प्रमुखांना विचारले असता बोर्ड बनवायला टाकलेत अशी उत्तरे देण्यात येत आहे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल.
[better-ads type=’banner’ banner=’7208′ ]
प्रतिक्रिया: प्रफुल सोळंकीमुळात आपला ग्रामीण भाग आहे ज्येष्ठ नागरिकांना बोर्ड वाचायची पंचायत इकडून- तिकडून एखाद्या शिकलेल्या माणसाला विचारले तर तो सांगेल हे अपेक्षा परंतु बोर्ड गाडीवरच नसेल तर कोण काय सांगणार ?
