परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करावी – ॲड. डॉ. अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी
समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी व्यसन,अज्ञान ,तंटा व चुकीच्या परंपरेला फाटा देत समाजातील शिकणाऱ्या मुलांना होळी महोत्सवा निमित्त परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांची शैक्षणिक चळवळ सुरू करून हा नवीन पायंडा सुरू करावा. असे होळी महोत्सव प्रसंगी ॲड डॉ अरुण जाधव बोलत होते.

आज दि.२४ मार्च २०२४ रोजी जामखेड jamkhed शहरातील तपनेश्वर रोड येथील नाथनगर येथे नाथपंथी डवरी गोसावी समाज्याच्या वतीने होळी चे आयोजन करण्यात आले होते.जामखेड jamkhed तालुक्यात नाथपंथी डवरी गोसावी समाज गेल्या ७० वर्षा पासून राहतो. हा समाज वर्षभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करतो. होळी सणा निमित्त हा समाज एकत्र येतो. ग्रामीण विकास केंद्र संचलित, माय लेकरू प्रकल्पाच्या वतीने मुलांना ॲड डॉ अरुण जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.
पुढे बोलताना जाधव म्हणाले,समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी समाजातील नेतृत्व करणाऱ्या माणसाने समाजातील माणसाच्या हाताला धरून परिवर्तन करण्याची गरज आहे. तसेच समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समाज एकत्रित करून समाजातील नेत्यांनी प्रबोधन करून दिशा देण्याचे काम करावे. यावेळी प्रा.कैलास माने म्हणाले की,तरुणांनी एकत्र येत रूढी, परंपरेतून परिवर्तन करणे गरजेचे आहे.यातून समाजातील पुढील पिढी आदर्श निर्माण करेल. लहान मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शैक्षणिक चळवळ सुरू करावी.
भटक्या जमातींना एकत्र आणण्याचे कार्य ॲड डॉ अरुण जाधव यांनी केले.होळी या सणानिमित्त सर्व भटका समाज आपले हेवे – दावे विसरून एकत्र येतात हे उल्लेखनीय आहे. उत्तम सावंत म्हणाले की,प्रत्येक वेळी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या हक्क अधिकारासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲड .डॉ.अरुण जाधव हे आहेत आपल्या भटक्या समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.यावेळी मोहन पवार,संपत राळेभात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.व होळी सणा निमित्त शुभेच्छा दिल्या.
जामखेड येथील नाथपंथी डवरी गोसावी समाज एकत्र करण्याचे काम आकाश शेगर, राजु शिंदे, सागर चव्हाण, अजिनाथ शिंदे, संतोष शेगर, संतोष चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी ॲड डॉ अरुण जाधव,प्रा. संपत राळेभात, मोहन पवार,उत्तम सावंत, संदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार,फुलाबाई शेगर ,रुक्साना पठाण, मोहन चव्हाण,अशोक शिंदे (करमाळा), अण्णा मोरे,आकाश पिंपळे,संतोष शेगर,दया चव्हाण जयप्रकाश शेगर ,विष्णू चव्हाण आदी माहिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश शेगर, राजु शिंदे, साहिल चौगुले, विशाल शिंदे, कुशाल शेगर, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आकाश शेगर यांनी मानले.
