जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासन या घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे परंतु अद्यापही या समूहातील बहुसंख्य लोक शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही बाब विचारात घेऊन भटक्या व विमुक्त समाजातील जमातीच्या कल्याणासाठी आराखडा तयार करण्याकरता भटक्या व विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कार्यकर्ता बैठक मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३/५/२०२३ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत खालील विषयावर सखोल चर्चा झाली

अहमदनगर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जात प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदान कार्ड , शंभर टक्के शालेय प्रवेश , तालुक्यातील समिती स्थापन करणे , आरोग्य विषयक सुविधा , ऊसतोड कामगार ओळखपत्र वाटप करणे , महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत उपलब्ध सुविधा , वसंतराव नाईक तंटा वस्ती सुधार योजना , यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना , धनगर समाज घरकुल योजना , घरकुलासाठी जागा खरेदी योजना , बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे , गायरान जमिनीत बांधलेले घरकुल नियमानुकुल करणे अशा प्रकारे विमुक्त जाती व भटक्या जमाती च्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला .आणि या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा यावर सखोल चर्चा झाली.
हा कृती आराखडा तयार करताना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर चे श्री राधाकिसन देवढे साहेब, समाज कल्याण समितीचे जिल्हा सदस्य ॲड. डॉ. अरुण जाधव, समाज कल्याणचे निरीक्षक व्ही. डी. लाड, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू मोहोळ, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे समन्वयक संतोष भोसले, ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्या लता सावंत, उज्वला मदने, व एम ट्रस्टचे संदीप कुंभार, किरण सूर्यवंशी, छाया नवले आदी शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच महाराष्ट्रात (maharashtra) भटक्या विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला.