राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा मोठा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला
नागपूर येथील रंजना नागपूरकर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट!
नेमकं प्रकरण काय?
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, नागपूरच्या रंजना नागपूरकर यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलीस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल लावून देण्याच्या नावाखाली धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.
मात्र पैसे देऊनही काम झाले नाही. या व्यवहारामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळेच पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या पाहुण्यांचीच फसवणूक” — जरांगे
जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी या प्रकरणाचा संबंध थेट फडणवीस कुटुंबाशी जोडला. त्यांनी सांगितले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्या नातेवाईकांशी संबंधित कुटुंब असल्याने हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे पाहुणे ठरतात.
“देवेंद्रजी, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तुमच्याच पाहुण्यांसोबत हा प्रकार घडला आहे. संबंधित महिला माझ्याकडे येऊन न्याय मागत आहेत,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
धमकी दिल्याचाही आरोप
रंजना नागपूरकर यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, पतीच्या निधनानंतर पैसे परत मागण्यासाठी त्या परळी येथे गेल्या असता त्यांना पिस्तूल दाखवून धमकावण्यात आले. पैसे परत मिळाले नाहीतच, उलट जीवे मारण्याची भीती दाखवून हाकलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
Table of Contents
सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांची नावे या प्रकरणात चर्चेत आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात आणि सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
