Rohit Pawar – महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट

अहमदनगर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे असे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी म्हटले आहे, अहमदनगर शहरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Table of Contents
आमदार रोहित पवार Rohit Pawar यांना या विषयी प्रश्न विचारले असता त्यांनी असे म्हटले कि, महाराष्ट्राची परिस्थिती वाईट आहे तुम्ही जर कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या राज्यांमध्ये बघितली तर अतिशय बिकट आहे महिलांवर अत्याचार होत आहेत मर्डर खुलेआम त्या ठिकाणी एका युवा कार्यकर्त्याचा ठिकाणी हल्ला करण्यात आला हा हल्ला कुणी केला याचा अंदाज हा सगळ्यांनाच आहे अशा परिस्थितीमध्ये काय कारवाई केली जाते हे आपल्याला बघावं लागेल.
माघील काही घटनांचा उल्लेखहि केला मावळ तालुक्यात घ्या नगरमध्ये घ्या खुलेआम हल्ले होतात. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असे प्रश्न पडतो,

पुण्यामध्ये सुद्धा महिलेवर जेव्हा एका हल्ला झाला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सुद्धा नव्ह ते अशी आजची परिस्थिती आहे तर या सगळ्या विषयांवर आम्ही इथं जे विरोधात असणारे आमदार आहेत ते सरकारला प्रश्न लोकांच्या वतीने आम्ही विचारू असेआमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी सांगितले
