अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे विधानसभा Vidhansabha निवडणुकीकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींनी देखील जोरदार तयारी केली आहे. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.
Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद..

अशातच आता विधानसभेची Vidhansabha आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. कारण उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
तसेच मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असताना देखील सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आली आहे.
तसेच महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे.
