नगर दि. २२ नोव्हेंबर 2023 रोजी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर ,सह मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार,अहमदनगर,आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशन [ We Foundation] यांचे सयूंक्त विद्यमाने आज कला,वाणिज्य विज्ञान व एच. एस.सी.व्होकेशनल शाखेतील 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा 01जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदार विद्यार्थ्यांचा मतदार नावनोंदणी voter registration कॅम्प संपन्न झाला.

voter registration नोंदणीला युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद
मा. श्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांची जी संकल्पना आहे ती म्हणजे जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करणे आणि हि नाव नोंदणी voter registration ऑनलाईन करावी जेणे करून अधिक वेळ जाणार नाही, आणि आपण आपल्या मतदान कार्ड काढण्यासाठी जी माहिती लागते ती स्वतः भरत असल्यामुळे चुकांचे प्रमाण फार कमी होईल; असा संदेश मा देशपांडे सरांनी दिलेला आहे.
UGC NET 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार कोणत्या विषयाची परीक्षा ?
नगर जिल्ह्यातील सर्व महाविल्यानि शंभर टक्के नाव नोंदणी करावी. ज्या महाविद्यलयाची मतदार नोंदणी शंभर टक्के असेल अशा महाविद्यालयांना विविध बक्षीशे तसेच प्रमाण पत्र देण्यात येणार आहे, याची सुरवात नगर जिल्ह्यातील न्यु आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालया पासून करण्यात आलेली आहे, नाव नोंदणी अंतिम तारिख ९ डिसेंबर आहे , त्यामुळे जास्तीत जास्त युवक- युवतीनी यामध्ये भाग घेऊन आपली नाव नोंदणी करून घ्यावी
नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला,पासपोर्ट फोटो, आई/वडील यांचे इपीक कार्ड(मतदान कार्ड) इत्यादी कागदपत्राची आवश्यकता लागते , हे कागदपत्रे असेल तर आपणहि घरी बसल्या आपले मतदान कार्ड काढू शकता , अगदी २ मिनिटात , त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून voter helpline हे अँप डाऊनलोड करायचे आहे

Table of Contents
या कार्यक्रमासाठी मा.संजय शिंदे,तहसिलदार अहमदनगर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.कल्पना दारकुंडे मॅडम,पर्यवेक्षक प्रा.सुभाष गोरे,नोडल अधिकारी डॉ.दत्तात्रय नकुलवाड,प्रा.सुधाकर काळे,प्रा.भरत कराळे, प्रा.नारायण गायकवाड मा.सचिन कांबळे,जिल्हा समन्वयक,मा.सागर भापकर तलाठी सावेडी, अहमदनगर तसेच कॉलेज कॅम्पस ॲम्बेसिडर, वर्गप्रतिनिधी व नवमतदार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय नकुलवाड यांनी तर प्रा.विलासराव वाळुंजकर यांनी आभार मानले.
