Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्याकडे कृषिमंत्री पद आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Dhananjay Munde कृषिमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले ?
मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, की कृषिमंत्र्याची माझ्यावर जबाबदारी दिली. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं वेगळं नातं आहे. शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगलं करता येईल. आज माझा वाढदिवस आहे, तर मला आगळावेगळा आनंद आहे. मी पहिल्यांदा कृषि मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे. त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.
वाचा: Tomato| टोमॅटोने उजळले शेतकऱ्याचे नशीब बनला करोडपती, वाचा सविस्तर शेतकऱ्याची संघर्षगाथा..
Table of Contents

मागेल त्याला शेततळे कृषिमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde
आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
